वाठार स्टेशन जवळ असलेल्या फडतरवाडी या गावात स्मशानभूमी नसल्यानं मरणानंतरही मृतदेहाचे हाल

कोरेगांव  : एकीकडे देश स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झालाय.मात्र, दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन नजदीक असलेल्या फडतरवाडी या गावात स्मशानभूमी नसल्यानं मरणानंतरही मृत्यूदेहाला हाल अपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत.याची गांभीर्याने दखल घेत गावकऱ्यांनी आपली एकजूट दाखवत स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त केलाय.दरम्यान आज सकाळी जोरदार पाऊस पडत असल्याने गावात आकस्मित मृत पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूदेह ग्रामपंचायतीसमोर जाळण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता.यावेळी गावकऱ्यांनी कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार अमोल कदम व गट विकास अधिकारी क्रांती बोराटे यांना बोलावून अडलेल्या स्मशानभूमीबाबतचा जाब विचारला.यावेळी संपूर्ण वातावरण तणावपूर्ण झालं होतं.मात्र,पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे संपूर्ण वातावरण निवळलं.यानंतर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा निवडण्यासाठी गावातील आजूबाजूच्या भागाची पाहणी केली व यावेळी स्मशानभूमीसाठी शासकीय जागेची निवड करण्यात आली.आता लवकरात लवकर हे काम मार्गी लागो हीच अपेक्षा.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त