मुंबईमध्ये टोल माप मग सातारचा का नाही-शशिकांत शिंदे

शिवथर.:  सध्याचे शासनाने महागाई मोठ्या प्रमाणात वाढवली आहे योजना राबवायच्या आणि आपल्याकडूनच पैसे वसूल करायचे आमचे सरकार सोयाबीन आणि शेतमालाला भाव मिळण्यासाठी योजना राबवत होतो आणि त्यासाठी अधिवेशनात देखील आवाज उठवत होतो . त्यासाठी अस्तित्व टिकवायचं असेल तर निवडणूक लढवली पाहिजे आणि हुकुमशाही गाढायची असेल तर ती मोडीत काढली पाहिजे त्याचे कारण दुधन वाढीच्या एका कार्यकर्त्यांनी अंबवडे भागातील युवकांसाठी कंपनी चालू केली होती त्याच कंपनीवर कारवाई करण्याचे काम विरोधकांनी केल ज्या दुष्काळ भागात अनेक वर्ष कंपनी चालू असताना देखील त्या कंपनीवर कारवाई केली त्याचे कारण माझ्याकडे माणूस आला की त्याच्यावर कारवाई आणि धमकी द्यायची त्यासाठी ही दहशत मोडून काढण्याची ताकत तुमच्याकडे आहे तसेच मतं दिली नाहीत तर योजना बंद केल्या जातील असे म्हणणाऱ्याला मोडीत काढले पाहिजे महायुती सरकारने मुंबईचा टोल माफ केला मग सातारचा का नाही असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.

अंबवडे सं वाघोली तालुका कोरेगाव येथे कार्यकर्ता संवाद मेळावा प्रसंगी ते बोलत होते. प्रास्ताविक अर्जुन सकुंडे यांनी केले अंबवडे व परिसरातील गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तसेच यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला निलेश जगदाळे म्हणाले. आज पर्यंत आमदार शशिकांत शिंदे यांनी या भागामध्ये करोडो रुपयांची कामे केली त्याची त्यांनी जाहिरात बाजी केली नाही दुष्काळाच्या काळात वसना उपसा सिंचन योजनेतुन या जनतेसाठी आठ वेळा पाणी सोडलं यावेळी मी केलं मी केलं म्हणणारे कुठे होते त्यांना या भागातील जनतेचे काही देणं घेणं नव्हतं परंतु आमदार शशिकांत शिंदे यांचा या भागावर पूर्वीपासूनच प्रेम आहे आणि त्यांना जो जो शब्द टाकला तो तो पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला