कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
राजेंद्र बोन्द्रे
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
- बातमी शेयर करा
फलटण.: दिनांक 3 जुलै 2026 रोजी मुंबई येथील विधान भवन मध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये फलटण शहरातील जलस्त्रोत नैसर्गिक जलाशय तळी यांचं पुनर्जीवन करणे याबाबत प्रश्न उपस्थित झालेला होता सदर प्रश्न हा फलटण तालुक्याच्या दुष्काळी परिस्थिती वर अत्यंत ज्वलंत आणि सत्य बाजू मांडणारा होता परंतु दुर्भाग्य असं की कथनी आणि करणी यामध्ये फरक यावेळेस दिसुन आला. फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अनेक तळ्यांची यापूर्वी झालेली दुरावस्था तसेच फलटण शहराच्या आजूबाजूच्या भागांमध्ये (कोळकी, झिरपवाडी फरंदवाडी, तावडी) असलेल्या नैसर्गिक जलाशय ज्यामध्ये पाझर तलाव असतील नैसर्गिक तळी असतील यामध्ये झालेले अतिक्रमणे तसेच यामध्ये बिल्डर रोड कॉन्ट्रॅक्टर यांच्यामार्फत टाकण्यात आलेला राडारोडा याचे विरोधात अनेकदा प्रशासनामध्ये तक्रारी करून देखील प्रशासनामार्फत आज अखेर कोणतीही कारवाई झालेली नाही. याउलट भ्रष्ट प्रशासन स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता नैसर्गिक जलस्रोत तळी तलाव यांची विल्हेवाट लावणं त्याच्यामध्ये शहरात नव्याने सुरू असलेल्या सिमेंट रोड करिता उत्खनन करण्यात आलेले डांबर तसेच इतर राडारोडा टाकून सदर नैसर्गिक तळी आणि स्तोत्र मुजवण्याचं काम याच पाटलांच्या अधिपत्याखाली सुरू आहे. मुंबईत विधान मंडळात एक भूमिका आणि फलटणमध्ये एक भूमिका अशा परिस्थितीमुळे नागरिकांच्या मध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. अशाच प्रकारे सद्यस्थितीला फलटणमधील वनविभागाच्या जागेमध्ये नैसर्गिक तळे मुजवून त्या ठिकाणी उकरलेल्या रोडचे डांबर तसेच इतर राडारोडा टाकून सदर नैसर्गिक तळे मुजवण्याचा महापराक्रम वन विभागाने करून दाखवला आहे. तसेच सदर वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना अशाप्रकारे नैसर्गिक तळे मुजवून त्या ठिकाणी तळे खोल करून त्याचं सुशोभीकरण करण्याच्या तसेच तळे मुजवल्यास गिरवी नाका परिसरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पूर परिस्थिती सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. याबाबत सूचना तळे मुजविण्यापूर्वी वारंवार दिलेला होत्या परंतु वन विभागाने गांधारीची भूमिका घेऊन सदर नैसर्गिक शेततळे नेमकं कोणाच्या फायद्यासाठी मुजवले हे एक गौडबंगालच आहे. लवकरच त्याचाही सुगावा लागेल. बेंगलोर पॅटर्नचा विकास फलटणमध्ये नको आहे. निसर्गाचा ऱ्हास आणि भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा विकास नको आहे.
स्थानिक बातम्या
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
देऊर रेल्वे गेट दोन दिवस बंद; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
संबंधित बातम्या
-
महाबळेश्वरच्या विकासस्वप्नाला अखेर हिरवा कंदील!
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
-
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Thu 9th Jul 2026 04:58 pm













