सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांना ऊसाला चांगला दर देण्याशिवाय पर्याय नाही.

सातारा  : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले त्यांची दखल घेऊन मागील हंगामातील ऊस बिल १०० ते ५० रुपये शेतकऱ्यांना दिले या मध्ये राज्यांचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, पालकमंत्री कोल्हापूर व जिल्हाधिकारी यांनी मिळून हा तोडगा काढला तो संपूर्ण साखर उद्योग करणारे सांगली व सातारा साठी सुध्दा लागू करण्यात यावा व या बाबत कारखानदारांनी स्पष्ट भूमिका मांडावी.

सातारा जिल्ह्यातील काही साखर कारखाने भाडे तत्त्वावर देण्यात आले आहेत त्यांना मुळ संस्थेला भाडे द्यावे लागते तरीही ते ३१५१ पहिली उचल देतात मग ज्यांना भाडे द्यावे लागत नाही त्यांचा दर सुध्दा मागील हंगामात व यंदा जवळपास एकच कसा .

सातारा जिल्ह्यातील फलटण, खटाव, खंडाळा हे आजपर्यंत कमी रिकव्हिरी झोन म्हणून जिल्ह्यात या अगोदर कमी दर देत होते ते कारखाने ३०५१ ते ३१५१ पहिली उचल जाहीर करतात म्हणजे नेहमीपेक्षा जवळपास २५० ते ३५० रुपये जास्त मग जास्त रिकव्हिरी असणारे कारखाने दरात मागे कसे .

सातारा जिल्ह्यातील ज्या कारखान्यांचे उपपदार्थ निर्मिती केली जात नाही ते कारखाने उपपदार्थ घेणार्‍या कारखान्यांच्या बरोबरीने दर देतात व पहिली उचल सुध्दा देतात मग इतर उत्पादने घेणारे कारखाने जास्त दर का देऊ शकत नाहीत.

मागील गळीत हंगामात महाराष्ट्रातील जवळपास सात ते आठ साखर कारखानदारांनी एफ आर पी पेक्षा ३५० ते ५०० रुपये जास्त दिले मग अनेक वर्षे या उद्योगात असणार्‍या कारखान्यांना हे का जमले नाही. 

सातारा जिल्ह्यातील जावली,वाई, खंडाळा या भागातील असणारे साखर कारखाने शेतकऱ्यांसाठी आम्ही फार मोठे काहीतरी करत असल्याचा आव आणून लुटालूट चालविली आहे तिथला ऊस स्थानिक कारखान्यांना घातला तर २८०० रुपये टनाला व जरा लगत असलेल्या अजिंक्यतारा, शरयु , जरंडेश्वर या कारखान्याला ऊस घातला तर ३१०० ते ३१५१ रुपये मिळतात तर राजकारणासाठी खोटा कळवळा आनणारे स्थानिक शेतकऱ्यांचे पहिल्या उचलीलाच टनाला ३०० ते ३५० रुपये नुकसान करतात अजून पुढे जाऊन किती करणार व आता किसनवीर कारखाना यांनी २०० रुपये टनाला वाढ देऊन हे शेतकऱ्यांना दर देणे शक्य असताना का देत नव्हते व १००० कोटी च्या घोटाळ्याचे पुरावे जनतेला दाखवून सत्ता घेणारे आता हा दुसरा हंगाम चालू झाला तरीही कोणतीच कारवाई का करत नाहीत व शेतकऱ्यांचे अजून थकीत ऊस बिल करोडो रुपये कधी देणार.

सातारा जिल्ह्यात नव्याने सुरू होणारे कारखाने यांना अडथळा निर्माण करुन यांना सुध्दा शेतकऱ्यांना ज्यादा दर देण्याची इच्छा असताना देऊन देत नाहीत व आमच्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करायचा नाही अशी नोटीस पाठवल्या त्यापेक्षा आपला आजपर्यंतच्या या उद्योगातील अनुभव पणाला लावून जास्त दर जाहीर करुन दराची स्पर्धा करुन ऊस घेऊन जावा नवीन सुरू होणारे कारखाने यांना स्पर्धा करता येत तर तुम्ही येवढं जूने अनुभवी तुम्हाला का जमत नाही याचे शेतकऱ्यांना उत्तर द्या.

खटाव तालुक्यातील वर्धन अग्रो हा कारखाना शेतकरी स्वता ऊस पोहच केला तर ४१११ रुपये टनाला दर देण्याचे जाहीर करतो मग सातारा जिल्ह्यातील इतर सर्व साखर कारखान्यांची दरातून तोंडणी वहातुक वजा केली तर सरासरी ८०० रुपये वजा करावे लागतील मग ४१११ मधून ८०० रुपये वजा केले तर ३३११ रुपये शिल्लक राहतात सातारा जिल्ह्यातील इतर साखर कारखानदार शेतकऱ्यांना कसे फसवतात हे याच कारखान्यांने शिध्द केले आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर आवाहन करतो की दर पाहिजे असेल तर थोडे थांबा ऊस घालवण्याची घाई करू नका आता कुठे स्पर्धा चालू झाली आहे अजून चांगला दर मिळू शकतो आमचा प्रयत्न चालू आहेच फक्त तुमची साथ हवी.असे आवाहन स्वाभिमानी शेतकरीचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी केले आहे 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला