या ,पहा आणि तरचं कारवाईचा निर्णय घ्या
सुनिल साबळे- Mon 8th Jul 2024 01:22 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरातील राजवाडा चौपाटी आणि छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या परिसरातील अतिक्रमण हटवून अनेक दिवसांनंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागा कर्तव्यदक्ष असल्याचे दिसून आले. साईबाबा चौकात अतिक्रमणाच्या विळखा पडत असून नियमित वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होतो.त्यात लवकरच छत्रपतींच्या वाघनख्या साताऱ्यात येणार असून त्या पाहण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना या चौकातील वाहतूक कोंडीचा नाहक त्रास होऊ नये म्हणून, अतिक्रमणाचा विळखा सोडविण्यासाठी विनंती पुर्वक निवेदन दिले आहे. काही कारवाई केली नाही तर १९ जुलै पासून गांधीगिरी मार्गाने लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजय पार्टे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, बांधकाम अभियंता, नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
गोडोलीतील साईबाबा मंदिरासमोर चौकात रस्त्यावर अनाधिकृत बांधकाम करून उभारलेले मंदिर, चहूबाजूंनी हातगाडे, रस्त्यावर पार्किंग, सिग्नल यंत्रणा बंद , वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रण न करता वाहनधारकांची कागदपत्रे तपासण्यासाठी धडपडतात, असे या चौकाचे त्रांगडे झाले असून याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता
बांधकाम विभाग, मुख्याधिकारी
सातारा नगरपरिषद यांनी याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामुळे नियमित वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिकांना होतो. साईबाबा चौकातील अतिक्रमणावर कारवाई करणेबाबत तिघांना विनंती करत निवेदन दिले असून कारवाईची अपेक्षा केली आहे.ती दि.१८ जुलै पर्यंत न झाल्यास दि.१९ जुलै पासून याच चौकात गांधीगिरी मार्गाने लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचे अजय पार्टे यांनी निवेदनात म्हटले आहे.
साईबाबा चौकात सर्व बाजूंनी अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. एकाही गाळेधारकाने पार्किंगसाठी जागा सोडली नसल्याने रस्त्यावर वाहने उभी केली जातात.तर रोज नवीन अनाधिकृत हातगाडे उभे राहू लागल्याने चौकात वाहतूक कोंडी होते.येथील वाहतूक पोलीस वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करून वरकमाई करताना दिसतो.
आजपर्यंत या चौकातील एकदा ही एकाही अतिक्रमणावर कारवाई केली नाही. याला लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा आणि प्रशासनातील उदासीनता कारणीभूत ठरत आहे. नगरपालिका, बांधकाम विभाग आणि पोलीसांना या चौकाला पडलेला अतिक्रमणाचा विळखा सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत, ही खेदाची बाब आहे.
साईबाबा चौकात शालेय विद्यार्थी, नोकरदार, महिला, वृध्दांना
नियमित वाहतूक कोंडीचा नाहक त्रास होतो. स्थानिक नागरिक या कोंडीमुळे त्रस्त झाले असून छत्रपतींच्या वाघनख्या पाहण्यासाठी ऐतिहासिक साताऱ्यात येणाऱ्या शिवभक्तांना ही या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये, यासाठी या चौकातील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी विनंती निवेदनात केली आहे.
पोलीस, बांधकाम विभाग आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी या चौकात यावे, पहावे आणि अतिक्रमणावर कारवाई करावी अशी मागणी अजय पार्टे यांनी केली आहे.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Mon 8th Jul 2024 01:22 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Mon 8th Jul 2024 01:22 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Mon 8th Jul 2024 01:22 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Mon 8th Jul 2024 01:22 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Mon 8th Jul 2024 01:22 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Mon 8th Jul 2024 01:22 pm
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Mon 8th Jul 2024 01:22 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Mon 8th Jul 2024 01:22 pm
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Mon 8th Jul 2024 01:22 pm
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Mon 8th Jul 2024 01:22 pm
-
फलटण येथील गणेश मूर्ती विटंबनेप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करा .
- Mon 8th Jul 2024 01:22 pm









