कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी

फलटण : पृथ्वी चौक (पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौक) ते दहिवडी रोडदरम्यान कोळकी येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर (भैय्या) व भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी केली.

 या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. त्यानुसार अमरसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे आणि ग्रामस्थांनी संबंधित कंपनीचे अधिकारी त्यागी यांची भेट घेऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

 पाहणीदरम्यान बुवासाहेब नगर येथील ओढ्यात पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी मांडली. मात्र अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलाचे डिझाईन अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे की, कितीही पाऊस झाला तरी ओढ्यातील पाणी व्यवस्थित वाहून जाईल. पुलाच्या दोन्ही बाजूंना वॉल बांधून पाण्याचा निचरा सुरळीत होईल याची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 आरटीओ कार्यालयासमोर असलेला पूल तसेच बुवासाहेब मंदिराजवळील पूल या दोन्ही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात कितीही पाऊस झाला तरी पुलावरून पाणी वाहणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 सध्या आरटीओ कार्यालयासमोर वाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पुलाजवळ मोठा खड्डा पडला असून तो तातडीने बुजवण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच मुख्य पुलावरून वाहतूक लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

 या पाहणीवेळी संदीप नेवसे, रणजित जाधव, राजेंद्र खिलारे, किरण जाधव, किरण पखाले, गोरख जाधव, बाळासाहेब रिटे, रणजीत काशीद, वैभव गंगतिरे, सौरभ जाधव यांसह परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  दरम्यान, पुलाचे व रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुले करण्यात येईल, असा शब्द कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला