नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

वीर धरणातून नीरा नदी मध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात.

फलटण. संपूर्ण महाराष्ट्रात जोराचा मुसळधार पाऊस सुरू असून निरा देवघर, भाटघर  व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून नीरा नदीवर असणाऱ्या वीरधरणाचा पाणी पातळीमध्ये झपाट्याने लक्षणीय वाढ होत आहे. कार्यकारी अभियंता रा.पो. मोरे नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8/7/ 2026 रोजी दुपारी दोन वाजता वीर धरणाची पाणी पातळी578.75 इतकी असून उपयुक्त पाणीसाठा 8.21 टीएमसी झाला आहे. सद्यस्थितीला वीर धरण 87.27 टक्के लक्षणीय भरले असून जोराचा मुसळधार पाऊस चालू असल्याने वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणातून नीरा नदीमध्ये अल्पावधीतच पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात येईल ,त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये तसेच कोणत्याही प्रकारची जीवीत वित्तहानी होणार नाही याबाबतची दक्षता दक्षता घेण्यात यावी असे आवाहन नीरा उजवा कालवा विभाग फलटण कार्यकारी अभियंता श्री रापा मोरे यांनी केले आहे. 

नीरा नदीच्या काठावरच्या नागरिकांनी वेळीच खबरदारी घेऊन सतर्क राहावे असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला