पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?

पाचगणी : पाचगणीतील स्वच्छ भारत पॉइंट परिसरातील डोंगरउतारावर कचरा आढळल्याप्रकरणी तक्रार समोर आल्यानंतर स्वच्छता व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ठेकेदाराच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


नगरपरिषदेकडून वैज्ञानिक पद्धतीने कचरा हटविणे, प्रदूषण नियंत्रण मंडळासह पाहणी, सीसीटीव्ही बसविणे आणि भविष्यात अवैध डंपिंग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रश्न आहे की, करारानुसार कचरा संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नेमकी कशी पार पाडली जात होती?


जर नियमित कचरा संकलन आणि योग्य विल्हेवाट होत होती, तर डोंगरउतारावर कचरा कसा पोहोचला? संबंधित यंत्रणेकडून वेळोवेळी तपासणी झाली होती का? करारातील अटींचे पालन झाले की नाही, याची पडताळणी होणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.


पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या पाचगणीत कचरा व्यवस्थापनातील कोणतीही त्रुटी ही केवळ प्रशासकीय बाब नसून पर्यावरण, पर्यटन आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर विषय आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ आश्वासने न देता करारातील जबाबदाऱ्यांची स्वतंत्र चौकशी करून, त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमांनुसार कारवाई करण्याची मागणी होत आहे.


नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आहे—कचरा व्यवस्थापनाचा ठेका म्हणजे फक्त बिले उचलण्याचा करार नाही; तर पाचगणीचे पर्यावरण आणि पर्यटन प्रतिमा जपण्याची जबाबदारीही आहे. त्यामुळे या प्रकरणात वस्तुस्थिती समोर आणून जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला