देशात गेल्या २४ तासात 11 हजार 793 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 27 जणांचा मृत्यू
दिवसागणिक होणारी ही वाढ यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढवणारीSatara News Team
- Tue 28th Jun 2022 08:03 am
- बातमी शेयर करा

राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77 लाख 91 हजार 555 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले
सातारा न्यूज : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या २४ तासात देशात 9923 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासात 11 हजार 793 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात दिल्लीसह महाराष्ट्रात रूग्णवाढ होताना दिसत आहे.
दिवसागणिक होणारी ही वाढ यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे.देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 96 हजार 700 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 27 रुग्णांच्या मृत्यूनंतर देशातील एकूण कोरना मृतांची संख्या 5 लाख 25 हजार 47 वर पोहोचली आहे. एकूण संक्रमणांपैकी सक्रिय रुग्ण 0.21 टक्के आहेत. राष्ट्रीय कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 98.58 टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रात सोमवारी 2369 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर सोमवारी दिवसभरात एकूण 1402 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 1062 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासांत पाच कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77 लाख 91 हजार 555 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.
corona
Corona'sShirkawan
india
स्थानिक बातम्या
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Tue 28th Jun 2022 08:03 am
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Tue 28th Jun 2022 08:03 am
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Tue 28th Jun 2022 08:03 am
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Tue 28th Jun 2022 08:03 am
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Tue 28th Jun 2022 08:03 am
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Tue 28th Jun 2022 08:03 am
संबंधित बातम्या
-
मोठी बातमी; सर्व विवाहित आणि अविवाहित महिलांना गर्भपाताचा अधिकार
- Tue 28th Jun 2022 08:03 am
-
पाकिस्तानात टोमॅटो 500 रुपये किलो आणि कांदा 400 रुपये किलो
- Tue 28th Jun 2022 08:03 am
-
मणिपूरमध्ये भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त
- Tue 28th Jun 2022 08:03 am