तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
सुधाकर दुंदळे
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
- बातमी शेयर करा
मेढा : तळदेव येथे १०५ गावांमध्ये सलोखा व सामाजिक समरसता टिकून राहावी, तसेच जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी वाई कार्यालय आणि १०५ गाव समाज सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक समरसता जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली.
या बैठकीस मा. पोलीस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर परीक्षेत्र) ज्योती क्षीरसागर मॅडम, उपविभागीय अधिकारी साळुंखे साहेब, महाबळेश्वर पोलीस उपनिरीक्षक सांडभोर साहेब तसेच मेढा पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत माजी सभापती धोंडिबा जंगम व सरपंच रामचंद्र जंगम यांनी केले. बैठकीचे प्रस्ताविक उपविभागीय अधिकारी साळुंखे साहेब यांनी करत सामाजिक सलोख्याचे महत्त्व, कायदा व नागरिकांची भूमिका आणि बैठकीमागील उद्दिष्ट स्पष्ट केले.
यावेळी संजय संकपाळ गुरुजी यांनी १०५ गावांच्या समाज व्यवस्थेची रचना, कार्यपद्धती व सामाजिक बैठकींचे स्वरूप याबाबत सविस्तर माहिती दिली. समाज व्यवस्था ही कायदा-सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून सामाजिक समरसतेस बाधा येईल असे कोणतेही निर्णय घेतले जाणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
३२ गाव समाजाचे माजी अध्यक्ष ह.भ.प. धोंडीबा महाराज संकपाळ यांनी पारंपरिक १२ बलुतेदार पद्धतीचे उदाहरण देत गावागावातील एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले. गणेशजी उतेकर यांनी समाज व्यवस्थेची मजबुती स्पष्ट करत १०५ गावांमध्ये गुन्हेगारी कमी असून समाज आणि पोलीस प्रशासन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली. समाजातील काही समाजकंटकांवर समाज व्यवस्था प्रभावीपणे नियंत्रण ठेवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीत भाऊसाहेब मोरे, बबन सकपाळ, हरिभाऊ सकपाळ आदींनी समाजातील विविध प्रश्न मांडले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्योती क्षीरसागर मॅडम यांनी उपस्थितांना संबोधित करत येथील समाज व्यवस्थेचे कौतुक केले. समाजाने राबविलेले उपक्रम स्तुत्य असल्याचे नमूद करून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. तसेच वाद-विवाद गावपातळीवर किंवा समाजातच मिटवण्याचे आवाहन करत “सत्य ही तिसरी बाजू असते” या विचारातून संवादाने प्रश्न सोडवण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस १०५ गाव समाजातील समाजबांधव, पोलीस पाटील, तरुण वर्ग तसेच तळदेव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप सरपंच रामचंद्र जंगम यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. तळदेव ग्रामस्थांनी भोजन व बैठकीची उत्कृष्ट व्यवस्था करून कार्यक्रम यशस्वी केला.
स्थानिक बातम्या
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 17th Mar 2026 06:32 pm
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Tue 17th Mar 2026 06:32 pm










