खटाव तहसिलदारां विरोधातील तक्रार आरोपी तहसिलदारांनी स्वतःच निकाली काढली?
आरोपी तहसीलदार स्वतः न्यायाधीश बनल्या अन् केले स्वतःलाच दोषमुक्त?आशपाक बागवान.
- Mon 15th Jun 2026 05:43 pm
- बातमी शेयर करा
खटाव : खटाव तालुक्यातील तहसीलदार श्रीमती बाई सर्जेराव माने यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन न करता फक्त ध्वजारोहण केल्याच्या गंभीर आरोपावरून 'आपले सरकार' पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारीवर राष्ट्रध्वजाचा अवमान प्रकरणात 'स्वयं-न्याय' करत स्वतःच निकाल लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने स्वतःच न्यायाधीश बनून तक्रार फेटाळल्याने नागरिकांमध्ये संतापाची लहर उसळली आहे.
तक्रारदार नागरिकाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, तहसीलदार कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात फक्त ध्वजवंदन करणे अपेक्षित असताना ध्वजारोहण केल्याने राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला गेला नाही. ध्वज पूर्ण उभारणी केल्यानंतर ध्वज वरचेवर फक्त फडकवल्यानंतर फक्त ध्वजवंदन (सॅल्यूट) करणे आवश्यक होते. भारतीय ध्वज संहितेनुसार प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उभारणी करून फक्त ध्वजवंदन न करता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण (ध्वज खालून वरच्या दिशेने नेत फडकविणे) चे काम केले. त्यामुळे ध्वजाचा अवमान करणाऱ्या विद्यमान मा.तहसीलदार श्रीमती बाई सर्जेराव माने यांचे निलंबन करण्याची मागणी केली होती.
सदरच्या तक्रारीचा तपास आपले सरकार पोर्टल च्या अधिकाऱ्यांकडून संबंधित आरोपी तथा विद्यमान तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचेकडेच आली आणि स्वतः आरोपी असलेल्या तहसीलदारांनीच सदरची तक्रार निकाली काढली. निकाली काढण्यात आलेल्या उत्तरात स्पष्टीकरण देताना तहसीलदार श्रीमती बाई माने यांनी स्वतः लिहिले की, "सदर कार्यक्रम परंपरेनुसार झाला असून यामध्ये ध्वजाचा कोणत्याही प्रकारचे अवमान झालेला नाही." ही तक्रार बेकायदेशीरपणे निकाली काढल्याचा आरोप आता जोर धरत आहे. सरकारी पोर्टलवर तक्रारकर्त्याने केलेल्या दाव्याला स्वतः आरोपी अधिकाऱ्याने 'फेटाळले' हे प्रकरण नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानले जात आहे. नागरिकांमध्ये "आरोपी स्वतःच न्यायाधीश? हे कशाप्रकारचे प्रशासन आहे?" "राष्ट्रध्वज हा केवळ कार्यक्रमाचा भाग नाही, तो राष्ट्राचा गौरव आहे. यात हलगर्जीपणा अक्षम्य आहे." अनेकांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणि उच्च अधिकाऱ्यांकडे पुनः तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.
खटाव च्या विद्यमान तहसीलदार बाई माने यांच्यावर यापूर्वी लाचप्रकरणातही आरोप झाले होते, ज्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. प्रशासनाने याबाबत तत्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. अन्यथा या प्रकारामुळे 'स्वयं-न्याय' चा नवा पायंडा पडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Mon 15th Jun 2026 05:43 pm
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Mon 15th Jun 2026 05:43 pm
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 15th Jun 2026 05:43 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 15th Jun 2026 05:43 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 15th Jun 2026 05:43 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 15th Jun 2026 05:43 pm
संबंधित बातम्या
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 15th Jun 2026 05:43 pm
-
फलटणच्या विमानतळावरील पालखीतळाचे पहाणी न करताच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पावले पंढरीच्या दिशेने
- Mon 15th Jun 2026 05:43 pm
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Mon 15th Jun 2026 05:43 pm
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 15th Jun 2026 05:43 pm
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Mon 15th Jun 2026 05:43 pm
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Mon 15th Jun 2026 05:43 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 15th Jun 2026 05:43 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Mon 15th Jun 2026 05:43 pm












