औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
आशपाक बागवान
- Mon 3rd Aug 2026 01:20 pm
- बातमी शेयर करा
पुसेसावळी : औंध पोलीस स्टेशनच्या कार्यक्षम कारवाईमुळे एका ट्रक चालकावर झालेल्या दरोडा व जबरदस्तीच्या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणात एका आरोपीची ओळख पटवली असून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी सघन तपास सुरू ठेवला आहे. पोलिस प्रशासनाने दिलेल्या अपुऱ्या माहितीनुसार, फिर्यादी सलमान बालेखान बागवान (वय ४०, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मंगळवार पेठ, कराड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० ते १२.२० या दरम्यान मौजे वडी (ता. खटाव) येथील उड्डाणपुला पलीकडे पुसेसावळी-औंध रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या हुंदाई कारमधील चार अनोळखी व्यक्तींनी कार त्यांच्या ट्रकला आडवी मारली. त्यांनी फिर्यादीवर हाताने मारहाण केली, लाकडी दांडके व रॉडने जीवे मारण्याची धमकी दिली आणि मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेतला. “आम्ही साहेबांची माणसे आहोत. रस्त्यावर चालायचे असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील,” असे सांगत त्यांनी पासवर्ड विचारून फिर्यादीच्या मोबाइलमधून १० हजार रुपये त्यांच्या फोनपे/गुगल पे खात्यावर जबरदस्तीने ट्रान्सफर केले. याबाबत औंध पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २८ जुलै २०२६ रोजी रात्री २१.५५ वाजता (स्टेशन डायरी एंट्री क्र. ०९) गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०९(४), १२६(१), ३५१(२), ३५१(३) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक १ अविनाश सदाशिव साठे (सदर बाजार, सातारा) यांची ओळख पटली असून उर्वरित आरोपींची शोधमोहीम सुरू आहे. तपासी अधिकारी एस. डी. जानकर (सहा. पोलीस निरीक्षक) यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. परंतू या दाखल गुन्ह्या मधील फिर्यादी चे वाहनाचे प्रकार कोणते आणि त्याचा क्रमांक? कशाची वाहतूक करत असताना घटना घडली? कार चा नंबर अथवा इसमांचे वर्णन? सदरचे इसम खादीतील खाकीतील साहेबांची माणसे होती? इत्यादी परिपूर्ण माहिती न मिळाल्याने आरोपींनी तेच वाहन का लुटले? इतर कोणत्या वाहन चालकासोबत त्याच दिवशी तत्सम प्रकार घडला आहे काय? घडला असेल तर गुन्हा दाखल का झाला नाही? तसेच फिर्यादी दुध, फळभाज्या, जिवनावश्यक वस्तू कि जनावरे वाहतूक करत होता? ५० हजारांची मागणी करत मोबाईल फिर्यादी च्या हातातून हिसकावून घेत दहशत माजवून पासवर्ड घेतला तर फक्त १० हजार च का घेतले? गुन्हा दिनांक २७ रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडला तर गुन्हा नोंद करण्यासाठी फिर्यादीने तब्बल ३४ तास का लावले? दरम्यान फिर्यादीचे वाहन आणि त्यातील कथीत माल कोणत्या ठिकाणी हलविण्यात आला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पुसेसावळी : औंध पोलीस स्टेशनच्या कार्यक्षम कारवाईमुळे एका ट्रक चालकावर झालेल्या दरोडा व जबरदस्तीच्या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणात एका आरोपीची ओळख पटवली असून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी सघन तपास सुरू ठेवला आहे.
पोलिस प्रशासनाने दिलेल्या अपुऱ्या माहितीनुसार, फिर्यादी सलमान बालेखान बागवान (वय ४०, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मंगळवार पेठ, कराड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० ते १२.२० या दरम्यान मौजे वडी (ता. खटाव) येथील उड्डाणपुला पलीकडे पुसेसावळी-औंध रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या हुंदाई कारमधील चार अनोळखी व्यक्तींनी कार त्यांच्या ट्रकला आडवी मारली. त्यांनी फिर्यादीवर हाताने मारहाण केली, लाकडी दांडके व रॉडने जीवे मारण्याची धमकी दिली आणि मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेतला. “आम्ही साहेबांची माणसे आहोत. रस्त्यावर चालायचे असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील,” असे सांगत त्यांनी पासवर्ड विचारून फिर्यादीच्या मोबाइलमधून १० हजार रुपये त्यांच्या फोनपे/गुगल पे खात्यावर जबरदस्तीने ट्रान्सफर केले.
याबाबत औंध पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २८ जुलै २०२६ रोजी रात्री २१.५५ वाजता (स्टेशन डायरी एंट्री क्र. ०९) गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०९(४), १२६(१), ३५१(२), ३५१(३) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक १ अविनाश सदाशिव साठे (सदर बाजार, सातारा) यांची ओळख पटली असून उर्वरित आरोपींची शोधमोहीम सुरू आहे. तपासी अधिकारी एस. डी. जानकर (सहा. पोलीस निरीक्षक) यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
परंतू या दाखल गुन्ह्या मधील फिर्यादी चे वाहनाचे प्रकार कोणते आणि त्याचा क्रमांक? कशाची वाहतूक करत असताना घटना घडली? कार चा नंबर अथवा इसमांचे वर्णन? सदरचे इसम खादीतील खाकीतील साहेबांची माणसे होती? इत्यादी परिपूर्ण माहिती न मिळाल्याने आरोपींनी तेच वाहन का लुटले? इतर कोणत्या वाहन चालकासोबत त्याच दिवशी तत्सम प्रकार घडला आहे काय? घडला असेल तर गुन्हा दाखल का झाला नाही? तसेच फिर्यादी दुध, फळभाज्या, जिवनावश्यक वस्तू कि जनावरे वाहतूक करत होता? ५० हजारांची मागणी करत मोबाईल फिर्यादी च्या हातातून हिसकावून घेत दहशत माजवून पासवर्ड घेतला तर फक्त १० हजार च का घेतले? गुन्हा दिनांक २७ रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडला तर गुन्हा नोंद करण्यासाठी फिर्यादीने तब्बल ३४ तास का लावले? दरम्यान फिर्यादीचे वाहन आणि त्यातील कथीत माल कोणत्या ठिकाणी हलविण्यात आला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक बातम्या
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Mon 3rd Aug 2026 01:20 pm
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Mon 3rd Aug 2026 01:20 pm
पुसेसावळी विकास सेवा सोसायटीचे नवे नेतृत्व; शहाजी पाटील चेअरमन, शोभा कदम व्हा.चेअरमन बिनविरोध
- Mon 3rd Aug 2026 01:20 pm
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Mon 3rd Aug 2026 01:20 pm
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Mon 3rd Aug 2026 01:20 pm
संबंधित बातम्या
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Mon 3rd Aug 2026 01:20 pm
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Mon 3rd Aug 2026 01:20 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Mon 3rd Aug 2026 01:20 pm
-
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Mon 3rd Aug 2026 01:20 pm
-
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Mon 3rd Aug 2026 01:20 pm
-
महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार आता छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये
- Mon 3rd Aug 2026 01:20 pm











