तुटका कडा तलावातील जमिनीच्या मोबदल्यासाठी अभयसिंह जगताप यांची भुमिका महत्वाची ठरली..
१२ वर्षानंतर शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा..Satara News Team
- Sat 2nd Jul 2022 11:28 am
- बातमी शेयर करा
वरकुटे-मलवडी/वार्ताहर....
वरकुटे-मलवडी ता.माण येथील तुटका कडा तलावासाठी जमिनी अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना तब्बल १२ वर्षानंतर अभयसिंह जगताप यांनी घेतलेल्या दमदार भूमिकेमुळे मोबदला मिळणार असल्याने, शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.
सन २००९ ते २०११ च्या दरम्यान तुटका कडा तलावाचे काम पूर्ण झाले.सुमारे १०० एकर जमीनीचे क्षेत्र पाण्याखाली गेल्याने,मोबदला मिळण्यासाठी गेली १२ वर्षे येथील शेतक-यांनी जलसंधारण विभागाकडे खेटे घातले.मात्र अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी करीत प्रत्यक्ष कामाकडे कानाडोळा केला.त्यातच वरकुटे-मलवडी परिसरातील संधीसाधू नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांना पोकळ आश्वासने देत,उपेक्षितांना अनेक वर्षे खेळवले.मात्र १२ वर्षात संबंधित जमिनीच्या मोबदल्यासाठी कसलाही प्रस्ताव शासनदरबारी पाठवला नसल्याचे वास्तव आहे.यामध्ये नैराश्येनं खचलेल्या शेतकऱ्यांसाठी अभयसिंह जगताप यांनी खंबीर भुमिका घेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे पाठपुरावा केला.त्यानंतर १६ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संबंधित जमिनींचा मोबदला मागणी प्रस्ताव महामंडळाकडे पाठविण्याचे कबूल केले.परंतु ६ महिन्यानंतर अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई न केल्याने,अभयदादांनी शेतकऱ्यांसह १६ जून २०२२ रोजी पत्रकार परिषद घेऊन सदर जमिनींचा मोबदला मागणीचा प्रस्ताव १५ दिवसात शासनास सादर न केल्यास जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना गोमुत्राने अभिषेक घालण्याचा निर्णय घेतल्याने हालचाली गतीमान झाल्या.२२ जून रोजी माण-खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी,अभयसिंह जगताप आणि शेतकऱ्यांसह जलसंधारण अधिकाऱ्यांची बैठक झाली.यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना त्वरित हा प्रस्ताव महामंडळाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्याने,२४ जून २०२२ रोजी अधिकाऱ्यांनी सदर प्रकल्पातील भूसंपादनासाठी प्रकल्पाच्या १५.०४ कोटी रू.च्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी,मृद व जलसंधारण विभाग पुणे यांचेकडे प्रस्ताव पाठविला.अभयसिंह जगताप यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे अधिकाऱ्यांना जाग आल्याने प्रशासन तातडीने कामाला लागले.यामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि उप विभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांविषयी संवेदनशीलतेचे दर्शन घडवत अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली.अनेक वर्षे खितपत पडलेले शेतकऱ्यांच्या हिताचे काम मार्गी लागल्याने शेतकरी आनंदले असून,१२ वर्षांच्या लढ्याला अभूतपूर्व यश आल्याने शेतकऱ्यांनी अभयदादांचे मनःपूर्वक आभार मानले.
talav
futkatalav
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 2nd Jul 2022 11:28 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 2nd Jul 2022 11:28 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sat 2nd Jul 2022 11:28 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 2nd Jul 2022 11:28 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 2nd Jul 2022 11:28 am
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sat 2nd Jul 2022 11:28 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Sat 2nd Jul 2022 11:28 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sat 2nd Jul 2022 11:28 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 2nd Jul 2022 11:28 am













