वर्धनगड येथील खाशीबाई सावंत ( ताई ) यांचे निधनाने सामाजिक,सांप्रदायिक नेतृत्व हरपले ;

With the death of Khashibai Sawant (Tai) from Vardhangad, the social and communal leadership was lost;
ताईंचे असणारे मुलांच्या वरील सुसंस्कार, आज ही सगळ्या परिसरामध्ये परिचित आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्याही प्रकारचा आजार नाही अथवा कुठलेही व्यंग नाही. शेवटपर्यंत आपल्या शेतातील मातीशी नाळ जोडून, एक उत्तम शेती व मुलांना मार्गदर्शन करणे, नेहमीच महिला व सर्व ग्रामस्थ यांच्याशी हसत खेळत राहून सर्वांच्या सुखदुःखाच्या त्या साक्षीदार होत्या,त्यांचा हसतमुख असलेला नेहमीचा चेहरा,ताईला पाहिले की समाधान वाटायचे,मवाळ बोलणे बोलण्यातील आपुलकी त्यांचे कुटुंबावरील असलेले सुसंस्कार खरोखरीच शेवटच्या क्षणापर्यंत वाखाणण्याजोगे होते.

वर्धनगड : वर्धनगड येथील खाशीबाई  ज्ञानदेव सावंत यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने आज पहाटे साडेपाच च्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने वर्धनगड व परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. खाशीबाई ज्ञानदेव सावंत या ताई नावाने वर्धनगड मध्ये प्रसिद्ध होत्या. 90 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपले पती कै. ज्ञानदेव सावंत (दादा) यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दादा सरपंच पदी असताना वर्धनगड च्या विकासासाठी मोठा हातभार लावला होता. दादाच्या निधनानंतर त्यांचे कैलासवासी सुपुत्र शिवाजी सावंत यांनी आपल्या शांत संयमाने वर्धनगड  गावचे नेतृत्व करून वर्धनगड च्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहिले होते. मुलांनाही नेहमी ताईंची साथ असायची  ताईंचे असणारे मुलांच्या वरील सुसंस्कार, आज ही सगळ्या परिसरामध्ये परिचित आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्याही प्रकारचा आजार नाही अथवा कुठलेही व्यंग नाही. शेवटपर्यंत आपल्या शेतातील मातीशी नाळ जोडून, एक उत्तम शेती व मुलांना मार्गदर्शन करणे, नेहमीच महिला व सर्व ग्रामस्थ यांच्याशी हसत खेळत राहून सर्वांच्या सुखदुःखाच्या त्या साक्षीदार होत्या,त्यांचा हसतमुख असलेला नेहमीचा चेहरा,ताईला पाहिले की समाधान वाटायचे,मवाळ बोलणे बोलण्यातील आपुलकी त्यांचे कुटुंबावरील असलेले सुसंस्कार खरोखरीच शेवटच्या क्षणापर्यंत वाखाणण्याजोगे होते. आणि आजही त्यांचे दुसरे सुपुत्र किशोर सावंत ताईच्या आशीर्वादाने  वर्धनगड विविध कार्यकारी सोसायटी व्हाईस चेअरमन पदी विराजमान आहेत. तर त्यांचे थोरले सुपुत्र वसंत सावंत सामाजिक, तसेच वारकरी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये नेहमीच आघाडीवर राहून गावाच्या आध्यात्मिक तसेच वारकरी सांप्रदायिक कार्यामध्ये आघाडीवरच असतात, त्यांचे नातू  सुभाष सावंत हे राष्ट्रीय पातळीचे संभाजी ब्रिगेड या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी असून ते मुंबईमध्ये कार्यरत आहेत. अशा गुणवंत व  नामवंत कुटुंबाला तसेच गावाला प्रेरणा देणाऱ्या ताई आज पहाटे साडेपाच वाजता वृद्धापकाळाने त्यांना निधन झाले त्यांच्या जाण्याने. सर्व वर्धनगड व परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती यांचे पाठीमागे मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा सावडण्याचा विधी  रविवारी सकाळी साडेआठ वाजता वर्धनगड स्मशानभूमीमध्ये करण्यात येणार आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला