पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन
Satara News Team
- Sat 2nd Jul 2022 05:41 am
- बातमी शेयर करा
नवे सरकार राज्यात सत्तेत आल्याने ठाकरे सरकारचा हा निर्णय शिंदे सरकार कायम ठेवणार का? यावर प्रोत्साहन अनुदान योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.
सातारा न्यूज सातारा - वेळेत कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लावलेले निकष शिथिल केले आहेत. त्यामुळे सरसकट वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे; पण हा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अखेरच्या टप्प्यात घेतल्याने त्याचा शासन निर्णय निघाला नाही. त्यातच राजकीय स्थित्यतरांत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील नवे सरकार राज्यात सत्तेत आल्याने ठाकरे सरकारचा हा निर्णय शिंदे सरकार कायम ठेवणार का? यावर प्रोत्साहन अनुदान योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.
कर्जमाफी देताना वेळेत पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोना महामारीमुळे दोन वर्षे या निर्णयावर शासन निर्णय काढला नाही. संसर्ग कमी झाल्यामुळे आता शासनाने सर्व बॅंकांकडून माहिती मागवली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला; पण तोपर्यंत शासन अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आल्याने शासन निर्णय काढण्यात आला नाही; पण याबाबतच्या अधिसूचनेत कर भरणारे शेतकरी, पेन्शनधारक शेतकरी यांना वगळण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकारने कार्यकालाच्या अखेरच्या टप्प्यात याबाबतचा निर्णय घेतला. त्याचा शासन निर्णय काढला नाही. त्यामुळे ही योजना अडखळली आहे. राज्यात आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्याने ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला प्रोत्साहन अनुदानाचा निर्णय शिंदे सरकार कायम ठेवणार का? याकडे सर्वांच्या नजरा आहेत. त्यांनी हा निर्णय स्वीकारून शासन निर्णय काढण्याची सूचना केली, तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
ऊसउत्पादक शेतकरी ही निकषाच्या कचाट्यात सापडला होता. मात्र, ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर निकष शिथिल करण्यात आले. त्यामुळे आता सरसकट शेतकरी पात्र ठरणार आहे. यामध्ये ५० हजारांपर्यंतचे पीक कर्जाची मुद्दल वजा केली जाणार आहे. या योजनेत सहकारी, खासगी, राष्ट्रीयकृत बॅंकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्याचा समावेश आहे. यानुसार जिल्ह्यातील अडीच ते तीन लाख शेतकरी पात्र ठरणार आहेत.
dccbank
DCCbankelection
farmers
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sat 2nd Jul 2022 05:41 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 2nd Jul 2022 05:41 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 2nd Jul 2022 05:41 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 2nd Jul 2022 05:41 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 2nd Jul 2022 05:41 am
संबंधित बातम्या
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sat 2nd Jul 2022 05:41 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sat 2nd Jul 2022 05:41 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sat 2nd Jul 2022 05:41 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sat 2nd Jul 2022 05:41 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 2nd Jul 2022 05:41 am
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 2nd Jul 2022 05:41 am
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Sat 2nd Jul 2022 05:41 am
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Sat 2nd Jul 2022 05:41 am











