पत्रकार संभाजी चव्हाण यांच्या आत्महत्येच गुढ अद्याप कायम

पोलिसांच्या हाती नेमक लागले तरी काय..?

देशमुखनगर : एक महिना होऊन गेला, डिसेंबर महिन्यात बोरगाव पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातल्या भरतगाववाडीतील एका पत्रकाराने आत्महत्या केली होती, तेंव्हापासून पोलिसांचा तपास सुरू आहे. या तपासाच्या दरम्यान पोलासांच्या हाती काही धागेदोरे लागली, तर अधिक शोध मोहिमेदरम्यान मोबाईलचा सबळ पुरावा आहे.
    संभाजी चव्हाण यांनी केलेल्या आत्महत्याचे गुढ अद्याप कायम आहे, आत्महत्या केल्याची चर्चा असली तरी त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या संदर्भात तपास करणारे अधिकारी काहीच बोलायला तयार नसल्याने पोलिसांच्या हाती नेमके लागले तरी काय या प्रश्नाने अनेकांना चक्रावून सोडले आहे. चव्हाण यांनी आत्महत्या केल्यापासून हे प्रकरण तपासावर आहे, त्यामुळे या आत्महत्येचा उलघाडा लवकर करावा अशी मागणी परिसरातून  होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला