विहिरीत बडून शाळकरी मुलीचा मृत्यू

दहिवडी नजीक सपकाळवस्ती येथील घटना

दहिवडी : दहिवडीनजीक असलेल्या सपकाळ वस्तीवरील चौंडीच्या विहरीत एक १४वर्षीय शाळकरी मुलगी पाण्यात बुडून मयत झाल्याची दुर्घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेली सविस्तर हकीकत अशी की,कु.सानिका सपकाळ(१४) ही काल सकाळी दहाचे सुमारास शाळेत जाते असे सांगून निघून गेली.परंतु ती घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली.
    तद्नंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांना खबर लागली की सदर शाळकरी मुलगी ही विहरीत बुडून मयत झालेली आहे,माहिती मिळताच सपोनि अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला.
    यासंबंधी दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खांडेकर करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला