शांततेचा भंग केल्याप्रकरणी खेड करंजे भागात राहणा-या चौघांवर गुन्हा दाखल

सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल, सातारा समोरील सार्वजनिक रस्त्यावर आकाश भगवान कदम, यश अमर कदम, संतोष शिवाजी मालकर (तिघेही राहणार खेड तालुका सातारा) आणि सुधीर सुरेश कोळी राहणार करंजे सातारा या चौघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून आपसात भांडणे करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी या चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त