नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.

काय रिअल आणि काय रील?

चला तर एक मंथन करूयात आपण आपल्या स्वतः वरती.

रिअल काय आणि काय नो रिअल!

आपण जे आहोत तेच नो रिअल आहे कसे तर, सोशल मीडिया वर दिसणारे आपण नो रिअल आहोत. कित्येक फिल्टर लावून आपण आपला डीपी सजवितो, कधी आई वडिलांची किंवा वडील धाऱ्यांची मदत नं करणारे आपण ज्ञान देणारे रील शेर करतो, बडेजावं करणारे स्टेटस ठेवतो, सोशल मीडिया वर देश प्रेम, भाषा प्रेम दाखविणारे आपण स्वतःच्याच मातृभाषेला दुय्यम दर्जाची वागणूक देतो. चार चौघात बोलताना मध्ये मध्ये इंग्लिश भाषेच्या वापरण्याला  स्टेट्स समजणारा आपला समाज मराठी किंवा मातृभाषा बोलणाऱ्याला मागास समजतो, आपले सर्वोत्तम सात्विक अन्न त्यागून मांसाहारी, पश्चात्य पिझ्झा, बर्गर, आणि चायनीज खाण्याला स्टॅंडर्ड समजतो, कधी उसाचा रस न पिणारा कोका कोला ठम्स अप सारखे विषारी पेय ढोस ढोस ढोसतो, 

वारी, भजन यांना लाजणारा डीजे च्या तालावर बेधुंध नाचतो.

नद्यांना नाल्याचे स्वरूप देणारे आपण स्विमिंग पूल मध्ये पोहायला पैसे मोजतो एवढंच नव्हे तर पारंपरिक वेशभूषेला नाव ठेवून अंग प्रदर्शन करणारे तोडके कपडे घालण्याला फॅशन मानतो, काय रें हि आपली प्रगती? हि प्रगती नव्हे तर अधोगती आहे. माणसात माणुसकी आणि आपलेपणा महत्वाचा असतो, आपल्या संस्कृतीची जाण आणि अभिमान महत्वाचा असतो.

आपले पूर्वज काही मूर्ख नव्हते, त्यांनी अखंड परिश्रम व संघर्ष केलाय हे सर्व जपायला. या देशाने अनेक फाळण्या बघितल्या, अनेक युद्ध बघितले, परतंत्र्य भोगले,मुघल, इंग्रज, पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला तरीही आज आपली संस्कृती कायम आहे पण ती कुणामुळे?

महाराणा प्रताप, झाशीची राणी, आईसाहेब जिजाऊ, राजे श्री शिव छत्रपती, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद इत्यादी महापुरुषांमुळे!

यांनी जपलीय आपली संस्कृती, आपले पणा, आपली अस्मिता आणि आपण काय करतोय?

नुसते मोबाईल च्या जगात डिंग्या हाकतोय. यांच्या हाती जर मोबाईल असते आणि त्यांची मानसिकता आपल्या सारखीच असती तर आज आपण भीक मागायच्या देखील लायकीच राहिलो नसतो.

अंगावर कपडे नसते, खायला अन्न आणि राहायला छत्र नसते.

आज या आभासी दुनियेतून बाहेर येण्याची गरज आहे. आपली माय, माती, अस्मिता वाचावायला पाहिजे. दुनियेला दाखवायला नाही तर माणुसकीचे ऋण फेडायला जगलो पाहिजे, भूतदया जपली पाहिजे. प्राणीमात्रावर प्रेम केले पाहिजे. दान करून पैसा शुद्ध केला पाहिजे. गोर गरिबांची, अधू -अपंग, व रुग्णांची सेवा केली पाहिजे. खरा देव यातच आहे. सेवेतच आहे.

  1. मातृभाषेला जपलं पाहिजे. माज पैश्यात नव्हे तर माणुसकीचा असायला पाहिजे. 
  2. संकट काळी मोबाईल मध्ये विडिओ काढत न बसता मोठ्या मनाने व धाडसाने मदत केली पाहिजे. 

आपल्या देशाची धरोहर जपली पाहिजे. गड किल्ल्याचे संरक्षण केले पाहिजे. थोर मोठ्यांचे आदर्श पाळायला हवेत. एकत्र कुटुंब पद्धती जपायला पाहिजे. भ्रष्टाचार रोखला पाहिजे यातच देश हित समावले आहे. हाच खरा विकास व आपली भागीदारी आहे. आई वडिलांचे कष्ट व मेहनत समजून घेऊन आपल्या परिवाराचा परिणामी देशाचा विकास करण्यास हातभार लावणे हेच आपले परम कर्तव्य आहे.

तरी आपण रिअल राहायला पाहिजे कारण या मुळे त्रास कमी होतो, जे आहोत, जसे आहोत तसेच सर्वांसमोर प्रकट व्हायला हवे, बडे जाव, खोट्या बाता, मोठं मोठ्या परिणामी खोट्या गोष्टी समाजाला दाखविण्यापेक्षा 'बोलें तैसा चाले त्याची वंदावे पाऊले' म्हणत जगायला शिकल पाहिजे. आज कितीही आपण पुढे गेलो तरी मायेची ममता, प्रेम, विश्वास विकत घेऊ शकत नाही म्हणून जगात आजही याच गोष्टी मौल्यवान आहेत आणि किती जग पुढे गेलं तरी भावनांची व प्रेमाची आणि ममतेची जागा AI घेऊ शकणार नाही म्हणून रिअल रहा आणि जगण्याचा मनसोक्त आनंद घ्या. 

धन्यवाद!
डॉ महेश ना. बलान्से 
९०९६९७७६३६

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला