जंतर-मंतरवरील रासपच्या मोर्चाला माण'मधून हजारो कार्यकर्ते जाणार :- दादासाहेब दोरगे

दहिवडी :  राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जाणकर यांच्या नेतृत्त्वाखाली दि. ५ ऑगष्ट रोजी रासप पक्षाच्या वतीने दिल्लीत जंतर -मंतरवर विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सातारा जिल्ह्यातील रासपच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहवे. असे आवाहन सातारा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब दोरगे यांनी म्हसवड येथे झालेल्या नियोजन बैठकीत केले आहे. यावेळी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनदादा विरकर , माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, जिल्हा युवक सचिव आकाश विरकर , माण तालुका अध्यक्ष दत्ता खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
       याबाबत रासपच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली दि. ५ ऑगष्ट रोजी जातीनिहाय जनगणना करणे, ओबीसी आरक्षण कायम करण्यात यावे, नॉन क्रिमिलिअरची , अट रद्द करणे, ५० टक्के सिलिंग हटवणे, सार्वजनिक संस्थानमध्ये संपुर्ण आरक्षण लागू करणे, न्याय व्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थानमध्ये आरक्षण लागू करणे, शेतक-यांच्या मालाला हमीभावाने खरेदीची हमी द्यावी. देशात भरमसाठ वाढलेली महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. तसेच नागरीकांना शिक्षण व आरोग्य या सुविधा मोफत उपलब्ध करुन देणे. इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी रासपकडून दिल्लीत जंतर मंतरवर लाखोच्या मोचार्चे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील रासप कार्यकर्त्यांनी या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन रासपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब दोरगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला