सातारा लोणंद रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करावी

शिवथर: सातारा जिल्हा प्रशासनाने सातारा लोणंद
 रस्त्यावरील जड वाहतूक त्वरित बंद करावी ती वळवून लोणंद मार्गे नॅशनलहायवे राष्ट्रीय महामार्गावरून सातारकडे करावी अन्यथा आम्ही रास्ता रोको करून सर्व वाहतूक बंद करू असा इशारा वडुथ शिवथर आरफळ आरळे रेवडी बोरखळ  परिसरातीलगावातील ग्रामस्थांनी केला

सातारा ते लोणंद रस्त्यावरील वाढेफाटा ते शिवथर या गावच्या हद्दीत खूप अपघाताचे प्रमाण सध्या वाढलेले त्याला मूळ  कारण यामार्गावरील असणारी जड वाहतूक मोठ्या  प्रमाणावर टोल वाचवण्यासाठी या  रस्त्याचा वापर करत असतात पण मुळातच हा रस्ताअरुंद असल्यामुळे या रस्त्यावर  जिल्हा   प्रशासनाने या रस्त्यावरील जड वाहतूक त्वरित बंद करावी ती वळवून लोणंद मार्गे नॅशनलहायवे राष्ट्रीय महामार्गावरून सातारकडे करावी अन्यथा आम्ही रास्ता रोको करून सर्व वाहतूक बंद करू असा इशारा वडुथ शिवथर आरफळ आरळे रेवडी बोरखळ परिसरातीलगावातील ग्रामस्थांनी केला
जिल्हा प्रशासन की पोलीस प्रशासन माझं एवढंचआव्हान आहे की सामान्य नागरिकांनी अशा घटना जर घडत असतील  तर आवाज उठवा कुठल्याही हिटलरशाही खाली आपण जगत नाही आपण या संविधानाच्या मार्फत या देशाच्या कायद्याचे पालन करून त्याच्यावर आवाज उठवू शकतो आणि असेही वाहनचालकांमधून बोलले जात आहे कर्तव्यात कसूर करत असाल तर आम्ही सर्व जनता गप्प बसणार नाही आणि याची दखल खुद्दपालकमंत्री शंभूराज देसाई व एस पी समीर शेख यांनी घ्यावी असेही जनतेमधून बोलले जात आहे.
      वेण्णा वाढे व कृष्णा  वडूथ नदीवरील अरूदं पुल दुरवस्था झालेली आहे . वेण्णा व कृष्णा नदीवर असलेले हे  पूल  सुमारे १७५ वर्षापूर्वीचाऐतिहासीक दगडी पूल आहेत . त्यावरुन मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत आहे . तसेच या पुलावरील वारंवार अवजड वाहतूकी मूळे रस्त्यावर मोठ मोठेखड्डे पडलेले आसतात
परिणामी या पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे . याची तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे काम उत्तम केले जावे . अन्यथा याठिकाणी मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही . या पुलाची अजून दुरवस्था होऊ नये म्हणून , यापुलावरून अवजड वाहतूक बंद  करण्यात यावी . अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावरुन अवजड वाहतूक तुर्तास बंद करण्यात यावी .  यापूर्वीही वडूथ ग्रामस्थांकडून अनेक वेळा निवेदन दिली आहेत  . सदर निवेदनाची योग्य ती दखल घेऊन अवजड वाहतूक बंद  करण्यात यावी .  यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास यास प्रशासन व शासन सर्वस्वी जबाबदार राहील . तरी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी उदयनराजे मित्र समूहाचे वडुथ गावचे अध्यक्ष व भाजपा जिल्हा युवा मोर्चा सातारा जिल्हा सचिव मदन साबळे यांनी केली आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला