ज्यांना गावात स्मशानभूमी बांधता येत नाही त्यांनी माण- खटावचा आमदार बदलायची स्वप्ने पाहू नयेत.....आ. जयकुमार गोरे
माझ्याविरोधात बत्ताशा, खोबऱ्यावरचे पैलवान नको, तगडा उमेदवार द्या- Satara News Team
- Mon 24th Jun 2024 07:53 pm
- बातमी शेयर करा
दहिवडी : येणाऱ्या काळात विरोधकांकडे निवडणुका लढविण्यासाठी पाणी, विकास, एमआयडीसी हे मुद्दे नसून त्यांचा एकच मुद्दा आहे, फक्त जयकुमारला पाडायचंय बस्स. त्यामुळे माझ्याविरोधात बत्ताशा, खोबऱ्यावरचे पैलवान नको, तगडा उमेदवार द्या, ज्यांना गावात स्मशानभूमी बांधता येत नाही त्यांनी माण- खटावचा आमदार बदलायची स्वप्ने पाहू नयेत असे आव्हान आमदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांना केले आहे
येणारी विधानसभेची निवडणूक ही पाण्यासाठी लढली जाणारी शेवटची निवडणूक असेल, हा शब्द आहे. माण-खटावचा पाण्याचा दुष्काळ प्रश्न मिटवलेला असेल. त्यामुळे येत्यापुढच्या निवडणुका विकास कामांच्या मुद्द्यावर लढू, असे आमदार जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.
माण तालुक्यातील दहिवडी येथे आभार मेळाव्यात ते बोलत होते. जयकुमार गोरे म्हणाले, ‘‘जिहे- कठापूर सिंचन योजनेचे पाणी उत्तर व पश्चिम माणच्या गावांना जोपर्यंत देत नाही, तोपर्यंत पाण्याचा लढा सुरूच राहणार आहे. आजपर्यंत दिलेले सर्व शब्द पाळलेत. जिहे-कठापूरचे पाणी हिंगणीत पोचत नाही, तोपर्यंत निवडणूक लढवणार नाही, हा पण शब्द दिलाय अन् तो पूर्ण करूनच निवडणूक लढवणार आहे. या योजनेतून उर्वरित वंचित गावांना पाणी दिले जाईल.
माढा मतदारसंघात भाजपला अडचणीत आणत जयकुमार गोरेंचे मताधिक्य कसे कमी होईल, यासाठी बारामती, फलटणमधून फिल्डिंग लावली गेली. माझ्याविरोधात इथल्या सर्व नेत्यांना एकत्र करूनही त्यांचा तुम्ही कार्यकर्त्यांनी टिकाव लागून दिला नाही. कार्यकर्त्यांनो, विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. आतापासून कामाला लागा, असा सल्ला त्यांनी दिला.
आमदार, खासदार बनायला निघालेल्यांना गावात किती मते मिळाली? याचा विचार करून स्वप्ने पाहावीत. गावात स्मशानभूमी बांधता येत नाही त्यांनी माण- खटावचा आमदार बदलायची स्वप्ने पाहू नयेत, असा टोला जयकुमार गोरे यांनी विरोधकांना लगावला.
विरोधकांकडे निवडणुका लढविण्यासाठी पाणी, विकास, एमआयडीसी हे मुद्दे नसून त्यांचा एकच मुद्दा आहे, फक्त जयकुमारला पाडायचंय बस्स. त्यामुळे माझ्याविरोधात बत्ताशा, खोबऱ्यावरचे पैलवान नको, तगडा उमेदवार द्या,असे आव्हान त्यांनी दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी कायम आग्रही होतो. भाजप व शिवसेनेच्या सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे, असेही त्यांनी नमुद केले.
Shivsena
Bjp
JaykumarGore
स्थानिक बातम्या
दिवाळी दहा दिवसांवर तरीही फटाके विक्रीची परवानगी नाही.
- Mon 24th Jun 2024 07:53 pm
शिवथर मध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे आगमन
- Mon 24th Jun 2024 07:53 pm
मुंबईत टोलमाफी; साता-याला का नाही?
- Mon 24th Jun 2024 07:53 pm
श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्या शालेय क्रीडास्पर्धेत यशस्वी भरारी...
- Mon 24th Jun 2024 07:53 pm
कारखानदारांविरोधात कराड-उत्तर मधून लढवणार निवडणूक: वसिम इनामदार.
- Mon 24th Jun 2024 07:53 pm
संबंधित बातम्या
-
कारखानदारांविरोधात कराड-उत्तर मधून लढवणार निवडणूक: वसिम इनामदार.
- Mon 24th Jun 2024 07:53 pm
-
लोकसभेला महायुती तोडली तेव्हा त्यांची निष्ठा कुठे गेली होती...आ.जयकुमार गोरे
- Mon 24th Jun 2024 07:53 pm
-
हा तर फलटणचा मुंज्या… रणजितसिंह निंबाळकरांनी रामराजेंवर टीका,
- Mon 24th Jun 2024 07:53 pm
-
रामराजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार
- Mon 24th Jun 2024 07:53 pm
-
साताऱ्यातील 8 मतदारसंघासाठी 36 उमेदवारांच्या मुलाखती थोरल्या पवारांनी घेतल्या.
- Mon 24th Jun 2024 07:53 pm