मुंबईत टोलमाफी; साता-याला का नाही?

सातारा : मुंबई शहरात प्रवेश करताना लागणारे तब्बल 5 टोल हलक्या वाहनांना माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने सोमवारी घेतला. मुंबईसाठी एक न्याय आणि इतर शहरांसाठी दुसरा न्याय कशासाठी? असा सवाल करत सातारा-कराडातील महामार्गांवर असलेले टोलही वाहनधारकांसाठी माफ करण्यात यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. मुंबईतल्या 5 प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईत टोलमाफी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आता राज्यात आणि केंद्रात महायुतीचेच सरकार असताना सार्वजनिक बांधकामाच्या रस्त्यावरील टोलमाफीचा निर्णय राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांसाठीही लागू करण्यात यावा, अशी वाहनधारकांची मागणी आहे. वाहन खरेदी करताना रोड टॅक्स घेतला जातो. तरी देखील विविध कारणांनी वाहनधारकांकडून शासनाकडून आर्थिक वसुली केली जात असते. टोलच्या माध्यमातूनही कर वसुली केली जाते. सातारा जिल्ह्यात तर दोन टोल उभे आहेत. सातारा जिल्हा नीरा नदीपासून सुरु होतो, कराड तालुक्यातील मालखेडपर्यंत जिल्ह्याची हद्द आहे. तसेच जिल्हावासियांना कोल्हापूरला जायचे झाल्यास आनेवाडी, तासवडे आणि किणी असे तीन टोलनाके पार करुन जावे लागते. तर पुणे, मुंबईकडे जायचे झाल्यास तासवडे, आनेवाडी, खेड शिवापूर, मुंबईकडे जाणार्‍या द्रुतगती मार्गावरील असे चार टोल भरावे लागतात. रस्त्यावर मोठे खड्डे असले तरी सक्तीने टोलवसुली केली जात असते. त्यामुळे वाहनधारकांना सर्वच बाजूंनी कोंडीत पाडण्याचे धोरण पहायला मिळत आहे. कुठेही जाताना वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. त्यामुळे महामार्गावरील टोलनाक्यांबाबत राज्य शासन दुजाभाव करत असल्याचा आरोप आता होताना दिसतो आहे. मुंबईप्रमाणेच कराड, सातार्‍यातही टोलमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त