शरद पवारांनी त्या काळात काँग्रेस फोडली ती गद्दारी नव्हती का ? ...उदयनराजे

सातारा : वाई येथे गद्दारांना पाडा, असे खासदार शरद पवार म्हणाले होते. परंतु, सत्ता असल्यापासून गेली साठ वर्षे केवळ त्यांनी व काँग्रेसने घोषणाच केल्या. लोकांची कामे केलीच नाहीत. लोकांच्या भावनांशी खेळले, याच्यापेक्षा मोठी गद्दारी होवू शकत नाही, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्यावर केली. सातारा येथे अनंत इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रांवर खासदार उदयनराजे भोसले, कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

 उदयनराजे म्हणाले, विनोद तावडे यांचे चारित्रहनन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे. एखाद्या रूममध्ये बसले असताना पैशाची बॅग ठेवून फोटो काढायचे, हे सगळे नियोजित आहे. राजकारणात अनेक वर्षांपासून असले प्रकार सुरूच आहेत. लोकांचा राज्यकारभारात सहभाग असावा, असे विचार मांडणारे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव होते. त्यांनी लोकशाहीचा पाया रचण्याचे काम केले. त्यांना अभिप्रेत असणारे लोककल्याणकारी राज्य झाले पाहिजे. परंतु, स्वातंत्र्यानंतरच्या काळात सत्ताधारी काँग्रेसने फक्त अनेक घोषणा केल्या. घोषणा फक्त मते मिळवण्यासाठीच होत्या. त्यांच्या ६० वर्षाच्या काळात कोणतीही कामे झाली नाहीत की चांगली धोरणे राबवली गेली नाहीत. परंतु, लोकांना प्रगतीच्या मार्गाने जायचे आहे. हाताचा पंजा सत्ता असताना काही करू शकला नाही. 

तुतारीने केवळ पोकळ घोषणांचा गाजावाजा केला जात आहे. मशालवाल्यांना तर त्यांनी काय काम केलंय ते मशाल घेवून शोधावे लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला. युगेंद्र पवार परदेशात राहतात बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार उभे आहेत. युगेंद्र पवार यांनी आयुष्य परदेशात काढले आहे. त्यांनी तसंच रहावं. ज्यावेळी काम करायचे होते त्यावेळी केले नाही. आता निवडणुकीच्या काळात हौशे नवशे गवशे असतात. त्यांना बळीचा बकरा केला असल्याचेही उदयनराजे यावेळी म्हणाले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला