तो भाजपच्या प्रवक्ता, त्रिवेदीची हलकपट्टी करा व राज्यपालाला खाली ओढून लांब फेकून दया: नाहीतर माझ मी बघतो श्री छ. उदयनराजे भडकले

राज्यपाल व त्रिवेदीची हकलपट्टी करा नाहीतर मी काय करायच ते करतो खा.श्री.छ.उदयनराजेंचा भाजपला इशारा*

सातारा: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण कमालीचे तापले आहे. कोश्यारी यांच्या या वक्तव्याबद्दल राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, या परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आपले सर्व वकिली कौशल्य पणाला लावून भगतसिंह कोश्यारी यांचा भक्कमपणे बचाव केला आहे. राज्यपाल कोश्यारींच्या मनात शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाविषयी कोणतीही शंका नाही. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. भगतसिंह कोश्यारी  यांच्या मनात शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मात्र, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फडणवीसांच्या भूमिकेशी फारकत घेत राज्यपाल कोश्यारींवर हल्ला चढवला आहे.
भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य करण्यापूर्वी शिवरायांचा इतिहास वाचायला हवा होता. कोश्यारींनी अशाप्रकारचे वक्तव्य करण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वी अनेकदा शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. यासंदर्भात भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र देणार आहे, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांविषयी अशी वक्तव्यं करणाऱ्या या लोकांची एकतर बुद्धी भ्रष्ट झाली आहे किंवा त्यांच्या अंगात विकृती असावी. यामुळे त्यांचा कदाचित अंतही होऊ शकतो. त्यांच्या वक्तव्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. राज्यपाल हे मोठं पद आहे. भगतसिंह कोश्यारी यांना झेपत नसेल तर या पदावरून बाजूला व्हावे, अशी खरमरीत टीका उदयनराजे भोसले यांनी केली. त्यामुळे आता हा वाद आणखी किती चिघळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनीही या मुद्द्यावरुन राज्यपाल कोश्यारी यांना फटकारले. राज्यपाल असं का बडबडतात, मला समजत नाही. याआधीही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन हटवावं अशी मागणी मी पंतप्रधान मोदींकडे केली होती. आताही मी तीच मागणी करतोय. खरंच अशी व्यक्तीच आम्हाला महाराष्ट्रात नको. या महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवाजी महाराज असंख्य जणांचे प्रेरणास्त्रोत आहेत. महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. घाणेरडे शब्द आणि इतके घाणेरडे विचार राज्यपालांच्या मनामध्ये येऊच कसे शकतात? यांना राज्यपाल म्हणून ठेवलंत तरी कसं? अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला