दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर

सातारा : सातारा नगर पालिकेतील हद्दवाढीनंतर नगरसेवक संख्या ३९ वरून ५० झाली असली तरी शहरातील अनेक महत्त्वाच्या परिसरांना अद्याप पुरेशा सुविधा मिळाल्या नाहीत. योग्य नियोजन झाले असते तर साताऱ्यात तीन नगराध्यक्ष निर्माण झाले असते व विकासाला गती मिळाली असती. दोन्ही राजांविरुद्ध लोकांची नाराजी प्रचंड आहे. निवडणुकीच्या निमित्ताने लोकांची खदखद उफाळून आली असून २ तारखेला मतदानातून लोक याची नक्कीच प्रचिती देतील, असा विश्वास सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार शरद काटकर यांनी व्यक्त केला.

शहरात ठिकठिकाणच्या प्रचारदौऱ्यात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद काटकर म्हणाले, शाहूपुरी, शाहूनगर परिसर नगरपंचायतीत रुपांतरित झाला असता तर विकासाला उभारी मिळाली असती.

शाहूनगर ग्रामपंचायत हा त्याकाळचा अॅक्टिव्ह भाग असून येथे नागरी सुविधा चांगल्या प्रमाणात आहेत. गडकर आळी, सैदापूर, कोंडवे ते वाढे फाटा असा विस्तृत नागरी परिसर होता. येथे नगरपंचायत झाल्यास विकासाचा निधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला असता. याचप्रमाणे विलासपूर, संभाजीनगर, कोडोली आणि खिंडवाडी असा त्रिशंकू परिसर एकत्र करून स्वतंत्र नगरपंचायत झाली असती तर या भागालाही स्वतंत्र नगराध्यक्ष मिळाला असता आणि विकासाला गती मिळाली असती.

कास तलावाची पाणीपातळी वाढलेली असून सायफन पद्धतीने शाहूपुरीपर्यंत, अगदी चौथ्या मजल्यापर्यंतही पाणी पोहोचू शकते. परंतु यासाठी आवश्यक ते प्रयत्न येथील आमदार-खासदारांनी केले नाहीत, असा आरोपही काटकरांनी केला. निधी उपलब्ध असूनही इच्छाशक्ती नसल्याने साताऱ्याचा विकास थांबला. बारामतीसारखी प्रगती साताऱ्यालाही शक्य होती, असे शरद काटकर म्हणाले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला