दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
Satara News Team
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा नगर पालिकेतील हद्दवाढीनंतर नगरसेवक संख्या ३९ वरून ५० झाली असली तरी शहरातील अनेक महत्त्वाच्या परिसरांना अद्याप पुरेशा सुविधा मिळाल्या नाहीत. योग्य नियोजन झाले असते तर साताऱ्यात तीन नगराध्यक्ष निर्माण झाले असते व विकासाला गती मिळाली असती. दोन्ही राजांविरुद्ध लोकांची नाराजी प्रचंड आहे. निवडणुकीच्या निमित्ताने लोकांची खदखद उफाळून आली असून २ तारखेला मतदानातून लोक याची नक्कीच प्रचिती देतील, असा विश्वास सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार शरद काटकर यांनी व्यक्त केला.
शहरात ठिकठिकाणच्या प्रचारदौऱ्यात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद काटकर म्हणाले, शाहूपुरी, शाहूनगर परिसर नगरपंचायतीत रुपांतरित झाला असता तर विकासाला उभारी मिळाली असती.
शाहूनगर ग्रामपंचायत हा त्याकाळचा अॅक्टिव्ह भाग असून येथे नागरी सुविधा चांगल्या प्रमाणात आहेत. गडकर आळी, सैदापूर, कोंडवे ते वाढे फाटा असा विस्तृत नागरी परिसर होता. येथे नगरपंचायत झाल्यास विकासाचा निधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला असता. याचप्रमाणे विलासपूर, संभाजीनगर, कोडोली आणि खिंडवाडी असा त्रिशंकू परिसर एकत्र करून स्वतंत्र नगरपंचायत झाली असती तर या भागालाही स्वतंत्र नगराध्यक्ष मिळाला असता आणि विकासाला गती मिळाली असती.
कास तलावाची पाणीपातळी वाढलेली असून सायफन पद्धतीने शाहूपुरीपर्यंत, अगदी चौथ्या मजल्यापर्यंतही पाणी पोहोचू शकते. परंतु यासाठी आवश्यक ते प्रयत्न येथील आमदार-खासदारांनी केले नाहीत, असा आरोपही काटकरांनी केला. निधी उपलब्ध असूनही इच्छाशक्ती नसल्याने साताऱ्याचा विकास थांबला. बारामतीसारखी प्रगती साताऱ्यालाही शक्य होती, असे शरद काटकर म्हणाले.
स्थानिक बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
संबंधित बातम्या
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
-
राज्यात सरकार युतीचे अन् पुसेसावळी जिल्हा परिषद गटात विकास निधीचे श्रेय मात्र भाजपचे?
- Sun 30th Nov 2025 02:00 pm











