"तरुण भारत" प्रतिनिधी संभाजी चव्हाण यांचे निधन

नागठाणे :: "तरुण भारत"चे नागठाणे प्रतिनिधी व भरतगावचे माजी उपसरपंच संभाजी चव्हाण वय 47 यांचे सोमवरी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. 
संभाजी चव्हाण हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांचे शिक्षण नवी मुंबई येथे झाले. त्याने मुंबईत अनेक छोटे मोठे व्यवसाय केले पण त्यांचे मन रमले ते पत्रकारितेत. उत्तम शेती हा सुद्धा त्यांचा आवडता छंद होता. पत्रकारितेसोबत त्यांनी राजकारण, समाजकारण यांतही आपला ठसा उमटवला.

चार डिसेंबर रोजी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणेने प्रयत्नांची शिकस्त केली. सिव्हिल सर्जन डॉ. चव्हाण, डॉ. भोसले, डॉ. ससाणे, प्रतिभा हॉस्पिटलचे डॉ. संजय साठे यांनी अद्यावत उपचार करण्याचे प्रयत्न केले.

त्यांचावरील उपचाराची दैनंदिन माहिती पत्रकारांचे जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, राज्य उपाध्यक्ष शरद काटकर यांच्याकडून घेतली जात होती. संभाजी  चव्हाण यांचे निकटवर्तीय खासदार संजीव नाईक यांनीही या दरम्यान त्यांची भेट घेतली होती.

अखेर मृत्यूबरोबरचा संघर्ष सोमवारी पहाटे 4.15 वाजता संपला.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले जय, वैभव, भाऊ हर्षद, प्रशांत असा परिवार आहे.

त्यांच्यावर राहत्या गावी भरतगाववाडी येथे अंत्यविधी होणार आहेत.

मृताम्यास शांती लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना !

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला