बंडखोरांसमोर नवे पर्याय? एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दुसऱ्यांदा फोन,

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग
Eknath Shinde Calls Raj Thackeray

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीही अद्याप पुढचा रस्ता स्पष्ट झालेला नाही. भाजपची याला फूस असल्याचा बातम्या समोर येत आहेत. त्यातच फडणवीस यांचं दिल्लीतील नेत्यांसोबत बैठक सत्र वाढलं आहे. 

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यास भाजपकडून सत्तास्थापनेसाठी तयारी सुरू आहे. मात्र, घटनात्मक बाबी अद्याप पेंडिंग आहेत. याशिवाय बंडखोर आमदारांच्या निलंबनावर शिवसेना ठाम असल्याने या प्रकऱणातील कायदेशीर पेचही वाढला आहे. त्यामुळे शिंदे गटातर्फे भाजव व्यतिरिक्त पर्यायांची चाचपणी सुरू आहे. यातच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दुसऱ्यांना फोन केल्याचं समोर आलंय.


सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात तब्बल 40 आमदार आहेत. शिवसेनेच्या एकूण 54 आमदारांपैकी 40 आमदार शिंदे गटात गेल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. 

मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला कोणतं वळण लागलं. याकडे पाहाणं गरजेचं आहे. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि सेनेचं खरं हिंदुत्व हेच असल्याचं म्हटलं. खरी शिवसेना त्यांचीच असल्याचंही शिंदे म्हणाले. सध्या राज ठाकरेही प्रखर हिंदुत्वावर भाषणं देत आहेत.

कायदेशीर पेच कायम

शिंदे गटाला एखाद्या पक्षात एंट्री करावी लागणार आहे. नाहीतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. पक्षांतरबंदी कारवाईपासून वाचवायचं असेल तर एकूण संख्याबळापैकी दोन तृतीयांश संख्या गटाला आवश्यक असते. पण तो गट एखाद्या पक्षात विलिन करावा लागतो. सध्या शिंदे यांच्याकडे संख्या असली तरीही, 16 आमदारांवर कारवाईचा बडगा आहे. यामुळे शिंदे गटाकडून मनसेचा पर्याय आजमावण्याचा विचार होऊ शकतो.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला