मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला माण बीडीओंचा कोलदांडा
Satara News Team
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
- बातमी शेयर करा
माण : माण तालुक्यातील हस्तनपूर येथील वैभव जयसिंग किसवे हे दि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी यांनी तातडीने दखल घेतली असून सातारा जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दि १७ ऑगस्ट रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब , माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे समवेत उपोषणकर्ते वैभव किसवे यांची बैठक झाली होती. या बैठकीत बीडीओंना १५ दिवसांच्या आत सर्व कागदपत्रांची पडताळणी करून तक्रारदार यांना न्याय देण्याचे व संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याचे सांगण्यात आले होते. अद्याप माण चे गटविकास अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला कोलदांडा दाखवला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हस्तनपूर ता. माण येथील वैभव किसवे हे राहत असलेल्या घरासमोरील मोकळी जागा पिढ्यानपिढ्या वहिवाट करत आहेत. किसवे कुटुंब यांच्या कडून ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना वारंवार लेखी , प्रत्यक्ष भेटून , तोंडी सांगून जागा नोंद करून कर आकारणी करण्यास विनंती केलेली असता . अद्याप जागेची नोंद केली नाही. याबाबत वेळोवेळी लेखी पाठपुरावा केला आहे. सदर जागेत दि. ३ मार्च रोजी स्थानिक ग्रामस्थांनी किसवे यांचे साहित्य जबरदस्तीने इतरत्र विस्कटून टाकून नुकसान केले आहे. त्याचबरोबर त्यांनी किसवे कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करून व धमकावून त्या जागेचा ताबा घेतला असून जीव मारण्याची धमकी दिली आहे. अशी तक्रारही शिंगणापूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे. वारंवार मागणी करूनही या जागेची नोंद झाली नाही सध्या येथील स्थानिक ग्रामस्थांकडून किसवे कुटुंबाला वावरताना त्रास होत आहे. या संदर्भात वैभव किसवे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी साहेब यांनी तातडीने दखल घेतली होती. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी मार्फत माणचे गटविकास अधिकारी यांना १५ दिवसांच्या आत सर्व कागदपत्रांची पडताळणी करून वैभव किसवे यांना न्याय देण्याचे व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी असा आदेश देण्यात आला होता. एक महिना झाला तरी अद्याप गटविकास अधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. अशी मागणी वैभव किसवे यांनी पुन्हा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. माणचे गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला कोलदांडा घातल्याचा आरोप लेखी तक्रारीत वैभव किसवे यांनी केला आहे. याबाबतीत किसवे यांनी ८ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे . तरीही बीडीओं यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे किसवे यांचे म्हणणे आहे.
#maan
स्थानिक बातम्या
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
संबंधित बातम्या
-
महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार आता छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
फलटणला अन्न व औषध प्रशासन सातारा यांच्या कारवाईची प्रतीक्षा.
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
खटाव तहसिलदारां विरोधातील तक्रार आरोपी तहसिलदारांनी स्वतःच निकाली काढली?
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
फलटणच्या विमानतळावरील पालखीतळाचे पहाणी न करताच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पावले पंढरीच्या दिशेने
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 23rd Sep 2022 07:12 am













