मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला माण बीडीओंचा कोलदांडा
- Satara News Team
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
- बातमी शेयर करा
माण : माण तालुक्यातील हस्तनपूर येथील वैभव जयसिंग किसवे हे दि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी यांनी तातडीने दखल घेतली असून सातारा जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दि १७ ऑगस्ट रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब , माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे समवेत उपोषणकर्ते वैभव किसवे यांची बैठक झाली होती. या बैठकीत बीडीओंना १५ दिवसांच्या आत सर्व कागदपत्रांची पडताळणी करून तक्रारदार यांना न्याय देण्याचे व संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याचे सांगण्यात आले होते. अद्याप माण चे गटविकास अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला कोलदांडा दाखवला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हस्तनपूर ता. माण येथील वैभव किसवे हे राहत असलेल्या घरासमोरील मोकळी जागा पिढ्यानपिढ्या वहिवाट करत आहेत. किसवे कुटुंब यांच्या कडून ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना वारंवार लेखी , प्रत्यक्ष भेटून , तोंडी सांगून जागा नोंद करून कर आकारणी करण्यास विनंती केलेली असता . अद्याप जागेची नोंद केली नाही. याबाबत वेळोवेळी लेखी पाठपुरावा केला आहे. सदर जागेत दि. ३ मार्च रोजी स्थानिक ग्रामस्थांनी किसवे यांचे साहित्य जबरदस्तीने इतरत्र विस्कटून टाकून नुकसान केले आहे. त्याचबरोबर त्यांनी किसवे कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करून व धमकावून त्या जागेचा ताबा घेतला असून जीव मारण्याची धमकी दिली आहे. अशी तक्रारही शिंगणापूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे. वारंवार मागणी करूनही या जागेची नोंद झाली नाही सध्या येथील स्थानिक ग्रामस्थांकडून किसवे कुटुंबाला वावरताना त्रास होत आहे. या संदर्भात वैभव किसवे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी साहेब यांनी तातडीने दखल घेतली होती. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी मार्फत माणचे गटविकास अधिकारी यांना १५ दिवसांच्या आत सर्व कागदपत्रांची पडताळणी करून वैभव किसवे यांना न्याय देण्याचे व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी असा आदेश देण्यात आला होता. एक महिना झाला तरी अद्याप गटविकास अधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. अशी मागणी वैभव किसवे यांनी पुन्हा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. माणचे गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला कोलदांडा घातल्याचा आरोप लेखी तक्रारीत वैभव किसवे यांनी केला आहे. याबाबतीत किसवे यांनी ८ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे . तरीही बीडीओं यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे किसवे यांचे म्हणणे आहे.
#maan
स्थानिक बातम्या
निढळची शाळा देशात रोल मॉडेल ठरेल! खा. शरद पवार
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
कास पठारावरील फुलांचा हंगाम आजपासून सुरू ....उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांच्या हस्ते उद्घाटन
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
व्यापाऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर राजपथ मार्गावर वाद्ये वाजवण्यावर बंदी, गणेश मंडळे आक्रमक
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
विजयकुमार किसन भुजबळ यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
कर्ज प्रकरणी खोटे आश्वासन देऊन शुभम हाउसिंग फायनान्स कंपनीकडून कर्जदारांची मोठ्या प्रमाणात लूट...
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
पोलिसावर पत्नीची तक्रार.अदखलपात्र गुन्हा दाखल
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी सह खटाव तालुक्यात चाललंय काय? रेशन फुकट अन् केवायसी ला मोजावे लागतात पैसे?
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायीकांचा सुवर्णकाळ सुरू?
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
आधी बदलीचे आदेश, नंतर साताऱ्यात पोलिस अधीक्षक यांच्या बदली आदेशाला स्थगिती
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
साताऱ्यात पोलीस अधीक्षक सुधाकर पठारे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांची वर्णी ..
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
१०८ रुग्णवाहिकेच्या निविदेची वर्क ऑर्डर निघाली
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
एसपी समीर शेख यांना विशेष सेवा पदक
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
राजेद्र कचरे वाईचे नवीन प्रांतअधिकारी नियुक्त
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
ठेकेदाराने १० दिवसांत महामार्ग दुरुस्त न केल्यास गुन्हे दाखल करणार ... जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
- Fri 23rd Sep 2022 07:12 am