मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला माण बीडीओंचा कोलदांडा
Satara News Team
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
- बातमी शेयर करा
माण : माण तालुक्यातील हस्तनपूर येथील वैभव जयसिंग किसवे हे दि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी यांनी तातडीने दखल घेतली असून सातारा जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दि १७ ऑगस्ट रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब , माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे समवेत उपोषणकर्ते वैभव किसवे यांची बैठक झाली होती. या बैठकीत बीडीओंना १५ दिवसांच्या आत सर्व कागदपत्रांची पडताळणी करून तक्रारदार यांना न्याय देण्याचे व संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याचे सांगण्यात आले होते. अद्याप माण चे गटविकास अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला कोलदांडा दाखवला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हस्तनपूर ता. माण येथील वैभव किसवे हे राहत असलेल्या घरासमोरील मोकळी जागा पिढ्यानपिढ्या वहिवाट करत आहेत. किसवे कुटुंब यांच्या कडून ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना वारंवार लेखी , प्रत्यक्ष भेटून , तोंडी सांगून जागा नोंद करून कर आकारणी करण्यास विनंती केलेली असता . अद्याप जागेची नोंद केली नाही. याबाबत वेळोवेळी लेखी पाठपुरावा केला आहे. सदर जागेत दि. ३ मार्च रोजी स्थानिक ग्रामस्थांनी किसवे यांचे साहित्य जबरदस्तीने इतरत्र विस्कटून टाकून नुकसान केले आहे. त्याचबरोबर त्यांनी किसवे कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करून व धमकावून त्या जागेचा ताबा घेतला असून जीव मारण्याची धमकी दिली आहे. अशी तक्रारही शिंगणापूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे. वारंवार मागणी करूनही या जागेची नोंद झाली नाही सध्या येथील स्थानिक ग्रामस्थांकडून किसवे कुटुंबाला वावरताना त्रास होत आहे. या संदर्भात वैभव किसवे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी साहेब यांनी तातडीने दखल घेतली होती. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी मार्फत माणचे गटविकास अधिकारी यांना १५ दिवसांच्या आत सर्व कागदपत्रांची पडताळणी करून वैभव किसवे यांना न्याय देण्याचे व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी असा आदेश देण्यात आला होता. एक महिना झाला तरी अद्याप गटविकास अधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. अशी मागणी वैभव किसवे यांनी पुन्हा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. माणचे गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला कोलदांडा घातल्याचा आरोप लेखी तक्रारीत वैभव किसवे यांनी केला आहे. याबाबतीत किसवे यांनी ८ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे . तरीही बीडीओं यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे किसवे यांचे म्हणणे आहे.
#maan
स्थानिक बातम्या
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
संबंधित बातम्या
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार आता छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
फलटणला अन्न व औषध प्रशासन सातारा यांच्या कारवाईची प्रतीक्षा.
- Fri 23rd Sep 2022 07:12 am











