दोन्ही आघाडीचे नेते साताऱ्याच्या विकासावर बोलतात.मात्र,इतर पक्ष मूग गिळुन बसतात !

सातारा : शहराला ऐतीहासीक वारसा असताना नगरपालीकेची अनेक पंचवार्षिक निवडणुकामध्ये सत्ता ही एकतर नवीआ किंवा सावीआ या आघाडीच्या नेत्यांच्याकडेच आलटून पालटून असते. तेच बोलतात.मात्र,इतर पक्ष मुग गिळून बसतात.
     निवडणुका आल्या की, एकमेकावर बेसूमार आरोप - प्रत्यारोप करत असतात. त्यांना जाणकार मतदार तर सोडाच. पण,स्वत:ला राष्ट्रीय पक्षाचे नेते म्हणून मिरवणारे सुद्धा एकही प्रश्न या दोन्ही आघाडीच्या नेत्यांना विचारत नाहीत. ते गप्प का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आसल्याचे मत रिपब्लीकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केले आहे.
         नविआचे नेते हे निवडणूका आल्यानंतर विकास खुटल्याचे व पैसे लुटल्याचे आरोप करतात.पण पाच वर्षे नगरपालीका सभागृहात मात्र टोकाचा विरोध करताना दिसून येत नाहीत.साविआचे नेते हे विकासासाठी इतके कोटी आणले, आम्ही हे केले ते केले.असे वारंवार सांगत असतात.आजही सातारा प्राथमिक सुविधापासून वंचीत कसा राहिला आहे ? एकही रस्ता चांगला नाही. एकही शाळा व आरोग्य सुविधा नगरपालीका देऊ शकली नाही. पैसे आणले तर विकास कोणाचा ? व कसा झाला ?  याचा लेखाजोखा तरी मांडून विकासाचे अँडीट करावे.शिवाय,भाजपेत्तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन पालिकेच्या निवडणुकांसाठी सामोरे गेले पाहिजे. अशीही  मागाणी चंद्रकांत खंडाईत यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला