मी लढणार अन् जिंकणारहीः प्रभाकर देशमुख
- धीरेनकुमार भोसले
- Sat 27th Jul 2024 08:25 pm
- बातमी शेयर करा
माण मतदारसंघ राष्ट्रवादीलाच माण विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीलाच मिळणार आहे. त्यामुळे मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा आहे. याबाबत आपण सर्वांनी निश्चिंत रहा असा ठाम विश्वास प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला.
दहिवडी, : धैर्यशील मोहिते-पाटील यांना खासदार होवून फक्त दोन महिनेच झालेत. दोन महिन्यात त्यांना जनतेचं दुःख समजलंय मात्र पंधरा वर्षे आमदार असलेल्या माणसाला हे समजलं नाही हे दुर्दैव आहे. खरंतर खासदारांना नाही तर झोपी गेलेल्या तुम्हालाच जागे होण्याची, आत्मपरीक्षणाची गरज आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला.
दहिवडी येथे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, भालचंद्र कदम, अॅड. संतोष पवार, हर्षदा देशमुख-जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख म्हणाले, माण-खटावला २००९ पुर्वी जेवढं पाणी मिळालं त्यातील तिसरा हिस्सा पाणी आपण वापरतोय. आपल्या हक्काचं दोन हिस्से पाणी सांगली व सोलापूरला जातंय. ९७ साली जिहे-कटापुर योजना मंजूर झाली. पाण्याचं आरक्षण झालं. पाणी यायला मात्र एवढी वर्षे लागली. खरंतर दुष्काळी कालावधी आंधळी धरणात हे पाणी आले असताना माण नदीत सोडणं आवश्यक होतं. दुर्दैवाने हे पाणी नदीत सोडलं नाही. त्यामुळे ना दुष्काळाची दाहकता कमी झाली ना लोकांचे अश्रू थांबले. त्यांनी पाणी न सोडण्याचं पाप केल्यामुळे लोकांची पिके जळाली.
प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, जिहे-कटापुरचे पाणी येरळवाडी धरणात सुध्दा जाते. धरणात पाणी यावे, तिथले बंधारे भरावेत यासाठी मोठा संघर्ष राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्वच पक्षांनी केला. यानंतर जिहे-कटापुरचे पाणी कोरेगाव मतदारसंघाच्या हद्दीपर्यंत सोडले गेले. पण माण मतदारसंघाच्या हद्दीत सोडले नाही. हा दुजाभाव का करण्यात आला? हे पाणी न सोडायला कोण जबाबदार आहे? हे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. हे पाणी जर सोडले असते तर शेतकर्यांची उभी पिके वाचली असती.
प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, २०१९ च्या निवडणूकीवेळी बिजवडी येथे आमदारांनी सहा महिन्यात पाणी इकडे आले नाही तर राजीनामा देईन असं जाहीर केलं होतं. त्यावेळी ज्याचं भूमिपूजन झालं त्याच प्रकल्पाचं पुन्हा एकदा भूमिपूजन झालं. सहा महिन्यात सोडा पाच वर्षांत ते पाणी आलं नाही. आणि आता ते पाणी पुढच्या पाच वर्षांत या भागात फिरेल हे सांगण्यात येतंय हे माण तालुक्याचं दुर्दैव आहे.
पाणी आणतोय म्हणणारा फाकड्या पंधरा वर्षे झोपलेल्या अवस्थेत आहे. जर पाणी आणायचं असतं तर फाकड्याने पंधरा वर्षात जिहे-कटापुरचं पाणी माण नदीत सोडलं असतं. पण ते सोडलेलं नाही. आता ते पाणी हिंगणी पर्यंत कधी येणार आहे? वितरण व्यवस्था कशी होणार आहे? याच्याबद्दल आजही काही सांगण्यात आलेलं नाही. आता गावोगावी सर्व्हेसाठी माणसं हिंडत आहेत. हा सर्व्हे मागील पाच वर्षांपूर्वी का झाला नाही? त्यावेळी त्याला मंजूरी का मिळाली नाही? त्याला पंधरा वर्षे का लागली? खासदारांना दौर्यादरम्यान शेतकर्यांनी ज्या अडचणी सांगितल्या त्या सोडविण्यासाठी त्यांनी बैठक घेतली, सुचना केल्या. खासदारांनी दोन महिन्यात जे काम केलंय त्याबद्दल राजकारणापलीकडे जावून त्यांना धन्यवाद दिलं पाहिजेत. मी पाणी आणतो, फाकड्याच पाणी आणणार असं का बोललं जातंय? मग पंधरा वर्षे का झोपी गेलाय तुम्ही?
............................................................................................................................................................
दिपक देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधीवरती असे आरोप होणं आणि ते प्रकरण उच्च न्यायालयात जाणं, दोनशे मयतांवर उपचार केल्याचे दाखवून त्याचे पैसे हडपणे, हे सर्वच अतिशय गंभीर आहे. याबद्दल त्यांनी खुलासा करण्याची करण्याची आवश्यकता आहे. त्याबद्दल खुलासा न करता पाण्याच्या कामाला चालना देत असलेल्या खासदारांवर टिका करण्यामध्ये त्यांनी वेळ घालवू नये. याऐवजी हक्काच्या साडेबारा टीएमसी मधील दोन तृतीयांश पाणी का बाहेर जातंय हे सांगावं.
स्थानिक बातम्या
आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही
- Sat 27th Jul 2024 08:25 pm
गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी
- Sat 27th Jul 2024 08:25 pm
स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त
- Sat 27th Jul 2024 08:25 pm
सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...
- Sat 27th Jul 2024 08:25 pm
संबंधित बातम्या
-
त्या ठेकेदाराचा चिठ्ठा पिल्ला माझ्याकडे , नादाला लागाल तर पुरुन उरेन : अकुश बाबा कदम
- Sat 27th Jul 2024 08:25 pm
-
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी फलटणचा आमदार स्वतंत्र नाही....बुवासाहेब हुंबरे
- Sat 27th Jul 2024 08:25 pm
-
नितीन पाटील यांची राज्यसभा खासदार पदी बिनविरोध निवड...घोषणेची औपचारिकता बाकी
- Sat 27th Jul 2024 08:25 pm
-
मी नितीन काकाला खासदार करतो, नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही. हे वक्तव्य तंतोतंत पाळले
- Sat 27th Jul 2024 08:25 pm
-
महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज आयोग जाहीर करणार
- Sat 27th Jul 2024 08:25 pm
-
दहिवडी नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल पूर्ण .पुढील नगराध्यक्ष पदाचा दावेदार कोण ?
- Sat 27th Jul 2024 08:25 pm
-
कोरोना काळात आर्थिक गैरव्यवहाराची याचिका दाखल करते दीपक देशमुख यांच्या घरावर 'ईडी'चा छापा
- Sat 27th Jul 2024 08:25 pm
-
वडूजच्या नगराध्यक्षपदाचा आज होणार फैसला;जाधव,गोडसेंची नावेही चर्चेत
- Sat 27th Jul 2024 08:25 pm