...तर राजभवनासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार – सुशांत मोरे
राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न ; फेर जनहित याचिकाही दाखल करणारSatara News Team
- Tue 8th Aug 2023 01:00 pm
- बातमी शेयर करा
सातारा, : विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची मुदत संपली असून लवकरच नवीन सदस्यांची नियुक्त राज्यपालांकडून होणार आहे. हे नियुक्ती करताना निकषानुसार राज्यपालांनी ती करावी अशी मागणी राज्यपालांकडे ई-मेल निवेदनाव्दारे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे. तसे न केल्यास उच्च न्यायालयात फेरजनहित याचिका दाखल करण्याचा तसेच राजभवनासमोर आत्मक्लेश आंदोलन दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्यपालांना दिलेल्या निवेदनात, विधान परिषद सभागृह हे विचारवंतांचे मानले जाते.या सभागृहात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा समावेश केला जातो. साहित्यिक ,पत्रकार, विचारवंत, सहकार, सामाजिक चळवळीशी संबधित व्यक्ती या सभागृहात असल्या पाहिजेत हे निकष आहेत.राजकीय सोय लावायची म्हणून कार्यकर्ते पदाधिकारी याना संधी दिली जाते हा या सभागृहाचा अपमान आहे. विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची मुदत संपत असून लवकरच या जागी नवीन सदस्यांची आपल्याकडून केली जाणार आहे. परंतु यापूर्वी अनेकदा राजकीय पक्षांनी निकषात बसतानाही आतापर्यंत राजकीय सोय म्हणून अनेकांची नियुक्ती केली गेली आहे आणि त्यांना तत्कालीन राज्यपालांनी मान्यता दिली. 1960 पासूनचा इतिहास बघितल्यास फक्त सर्वच राजकारण्यांनी घटनेच्या 171-5 कलमातील तरतूदी बासनात बांधून ठेवत आपल्या सोयीच्या राजकारणासाठी या तरतूदीचा उपयोग केला आहे. 1960 पासूनची यादी बघितल्यास 118 सदस्यांपैकी फक्त 11 किंवा 12 सदस्य हे 171-5 च्या चौकटीत दिसून येतात. त्यामुळे यावेळेस नियुक्ती करताना साहित्यिक ,पत्रकार, विचारवंत, सहकार, सामाजिक चळवळीशी संबधित व्यक्ती या सभागृहात जाणे आवश्यक आहे.
सध्या मुदत संपलेल्या सदस्यांच्या नियुक्तीबाबत प्रचलित निकष न पाळल्याने मी उच्च न्यायालयात जनहित याचिका (Wpst/17405/2014)दाखल केली आहे. तिची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यावेळेस राजकीय पक्षांनी शिफारस केलेले सदस्य प्रचलित निकषात बसत असतील तरच त्याची नियुक्ती करण्यात यावी. जर निकषाप्रमाणे नियुक्ती न झाल्यास मला पुन्हा फेर जनहित याचिका दाखल करावी लागेल. तसेच राजभवनासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असाही इशारा श्री. मोरे यांनी दिला आहे.
नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर ते घटनेच्या चौकटीत काम करण्याबाबत त्यांचा कटाक्ष दिसून येतो. त्यांमुळे त्यांनी केलेल्या नियुक्त्या या 171-5 च्या तरतुदींमध्ये बसणा-या आहेत. आता महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार असेल तरी सर्व सत्तासुत्रे भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याहात हातात आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी हिमंत दाखवली ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दाखवून 171-5 कलमातील तरतुदी आणि त्यामागील भावनांचा विचार करुन विधानपरिषदेतील नामनिर्देशित सदस्यांसाठी साहित्यिक ,पत्रकार, विचारवंत, सहकार, सामाजिक चळवळीशी संबधित व्यक्तीचीं शिफारस राज्यपालांकडे करावी अशी मागणीही सुशांत मोरे यांनी केली आहे.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 8th Aug 2023 01:00 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Tue 8th Aug 2023 01:00 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 8th Aug 2023 01:00 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Tue 8th Aug 2023 01:00 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 8th Aug 2023 01:00 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Tue 8th Aug 2023 01:00 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Tue 8th Aug 2023 01:00 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 8th Aug 2023 01:00 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Tue 8th Aug 2023 01:00 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 8th Aug 2023 01:00 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Tue 8th Aug 2023 01:00 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Tue 8th Aug 2023 01:00 pm











