पुसेसावळी दंगल प्रकरणी पोलिसांनी सहा आठवड्यात विक्रम पावसकर यांच्या सहभागाबाबतचा अहवाल द्यावा मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

सातारा : भारतीय जनता पक्षाचे नेते विक्रम पावसकर यांनी सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी केलेल्या   भाषणांमुळे हिंदू मुस्लिम तणाव वाढलेला आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील घडलेल्या हत्याकांडात विक्रम पावसकर यांचा असणारा सहभाग स्पष्ट करण्याकरता सरकारी वकील एच.एस. वेणेगावकर यांनी कलम 174 (8) या अनुषंगाने पुढील तपास करून मा. उच्च न्यायालयात सहा आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या बेंचने दिले आहेत. 

सातारा पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात इस्लामपूरचे राष्ट्रीय काँग्रेसचे शाकीर तांबोळी यांनी केलेल्या याचिकेवर हा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते विक्रम पावसकर यांनी  सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रामुख्याने खटाव तालुक्यातील औंध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये  जाती-जातीमध्ये तणाव निर्माण होईल व मुस्लिमांच्या विरोधात द्वेषपूर्ण अशी भाषणे केली होती. त्या विरोधात शाकीर तांबोळी तसेच विविध संघटना, कार्यकर्ते यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनास विक्रम पावसकर यांच्या विरोधात वेळोवेळी गुन्हे दाखल करण्याबाबत निवेदने दिली होती. औंध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुसेसावळी येथील मुस्लिम युवकाचा खून तसेच पुसेसावळी येथील सार्वजनिक व खासगी मालमत्तेची जाळपोळ व नुकसान या विरोधात औंध पोलीस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. भारतीय दंड संहिता कलम १५३,२९५ अ अन्वये गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले होते. गुन्हे दाखल झाले. परंतु राजकीय दबावामुळे पोलीस पुढील कारवाई करणेस टाळाटाळ करीत होते व त्याकरिता शासन मंजुरीची आवश्यकता असल्याने विक्रम पावसकर यांच्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती. त्यामुळेच शाकीर इसालाल तांबोळी यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली होती. 

दरम्यान सातारा जिल्ह्यातील  पुसेसावळी येथील घडलेल्या हत्याकांडांत विक्रम पावसकर यांचा असणारा सहभाग स्पष्ट करण्याकरीता सरकारी वकील एच.एस. वेणेगावकर यांनी कलम १७४(८) च्या अनुषंगाने पुढील तपास करुन सहा आठवड्यात मा उच्च न्यायालयात सादर करणेचे आदेश मा उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

दरम्यान पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात इस्लामपूरचे  राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शाकीर तांबोळी यांनी याचिका दाखल केली आहे.

या संदर्भात शाकीर तांबोळी म्हणाले की पुसेसावळी येथे घडलेल्या हत्याकांडाचा तपास हा पूर्णपणे राजकीय दबावाखाली एकतर्फी झाला असून यामध्ये गुन्हेगार मोकाट सुटले आहेत व पुराव्यांशी सुद्धा छेडछाड झाली आहे. व त्यामध्ये सातारा पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे त्याकरिताच मा.उच्च न्यायालयामध्ये या हत्याकांडांच्या फेरतपासासाठी एस.आय.टी. लावण्याची मागणी करीत आहोत.*

सांगली जिल्ह्यातील विटा व इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये दोन्हीही दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र तयार असून पुढील कारवाई शासन मंजुरी साठी प्रलंबित आहे असे सांगली पोलिसांनी उच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले होते.त्याच अनुषंगाने पुढील कारवाई करीता सरकारी वकील एच.एस. वेणेगावकर यांनी मा.उच्च न्यायालयास चार आठवड्याची मुदतीची विनंती मागणी केली असता मा उच्च न्यायालय यांनी ती मान्य करून चार आठवड्यामध्ये शासन मंजुरी घेऊन न्यायालयात चार्जशीट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

विक्रम पावसकर यांच्या हस्तक्षेप अर्जाच्या अनुषंगाने एडवोकेट डॉ. अभिनव चंद्रचूड व यशोधन देशमुख हे बाजू मांडत आहेत. तर शाकीर इसालाल तांबोळी यांच्या वतीने जेष्ठ कायदेतज्ञ मिहीर देसाई आणि श्रीमती संस्कृती याज्ञिक या काम पाहत आहेत. सरकारच्या वतीने एच एस वेणेगावकर व सहाय्यक सरकारी वकील श्रीमती पी.पी. शिंदे या काम पाहत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त