कोयनेत २८ टक्के, कण्हेर १४ टक्के तर उरमोडी ९ टक्के पाणी साठा.साता-यातील धरणांनी गाठला तळ

सातारा : जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत असून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत असल्याने धरणे रिकामी होऊ लागली आहेत. त्यामुळे अनेक धरणांनी तळ गाठला आहे. उरमोडी धरणात अवघा ९ तर कण्हेरमध्ये १४ आणि कोयनेत २८ टक्केच साठा राहिला आहे. त्यातच मागणी आणखी वाढल्यास धरणातील साठा संपुष्टात येणार असल्याने सर्वांचेच डोळे मान्सूनकडे लागले आहेत.

जिल्ह्यातील शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान पर्जन्यमान होते. यावरच जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची मदार असते. मात्र, गेल्यावर्षी जिल्ह्यातच अपुरा पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे ही भरली नाहीत. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणातही ९५ टीएमसीपर्यंतच साठा पोहोचलेला. परिणामी सिंचनासाठी सतत मागणी वाढत गेली. 

 

सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी आजही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या ३१०० क्यूसेकने सांगलीसाठी पाणी सोडले जात आहे. याच धरणात आता २८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ३३.१८ टीएमसीच पाणी आहे. तर उरमोडी धरणावर सातारा आणि माण, खटाव हे दुष्काळी तालुके अवलंबून आहेत. 

जिल्ह्यातील धरणांची स्थिती (टीएमसीमध्ये)

धरण - सध्याचा साठा - टक्केवारी - एकूण पाणीसाठा
कोयना -३३.१८ - २८.०२ - १०५.२५
धोम - ५.४१ - ३०.७८ - १३.५०
बलकवडी - ०.८२ - १७.७८ - ४.०८
कण्हेर - १.८४ - १३.९३ - १०.१०
उरमोडी - ०.९० - ९.०४ - ९.९६
तारळी - २.०८ - ३५.४३ - ५.८५

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला