हातगेघर ठराव फसला; जावळीतील राजकारण तापले, मानकुमरे बंधूंचा शिंदेंवर थेट राजकीय हल्लाबोल

मेढा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातगेघर विकास सेवा सोसायटीच्या ठरावासाठी बोलावलेली सभा कोरमअभावी पार पडू न शकल्याने जावळी तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर काही तासांतच आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून मानकुमरे गटाने शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार राजकीय टीका केली आहे.

ठराव प्रक्रिया पूर्ण न झाल्यानंतर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर संचालकांना ताब्यात ठेवल्याचा आरोप केला. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन संचालकांना समोर आणण्याची मागणी केली. या आरोपांवर शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही.

या घडामोडीनंतर मानकुमरे यांचे बंधू बापुसाहेब मानकुमरे यांनी फेसबुकवर “FIVE Times… यापुढे कधीच नाही” या मथळ्याची पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये शशिकांत शिंदे यांच्या विविध निवडणुकांतील पराभवांचा उल्लेख करत त्यांच्या राजकीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पोस्टमध्ये २०१९ ची कोरेगाव विधानसभा, २०२१ ची जिल्हा बँक निवडणूक, २०२४ ची सातारा लोकसभा, २०२४ ची कोरेगाव विधानसभा तसेच सध्याच्या घडामोडींचा संदर्भ देत सलग पराभवांचा दावा करण्यात आला आहे.

हातगेघर सोसायटीतील ठराव फसल्याच्या घटनेनंतर लगेचच ही पोस्ट व्हायरल झाल्याने सहकार क्षेत्रातील निवडणूक आता केवळ ठरावांपुरती मर्यादित न राहता सोशल मीडियावरही राजकीय संघर्षाचे नवे रणांगण तयार झाल्याची चर्चा सुरू आहे. जावळी आणि कोरेगाव परिसरात या घटनाक्रमाची मोठी राजकीय चर्चा रंगली असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला