खटाव मान साखर कारखान्याला भारतीय शुगरचा पुरस्कार ..संग्राम घोरपडे

देशमुखनगर : खटाव मान साखर कारखान्याला भारतीय शुगर तर्फे ओव्हर ऑल बेस्ट परफॉरमन्स मिळाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांनी दिली. 
  यावेळी बोलताना संग्राम घोरपडे म्हणाले की हा पुरस्कार आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे को चेअरमन मनोजदादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अतिशय चांगला पध्दतीने चालू आहे . सदरचा पुरस्कार हा कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाची पोहचपावती आहे.
भविष्य काळामध्ये सुद्धा कारखान्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी व शेतकर्यांचे हित जपण्यासाठी आम्ही कटिबद्द आहोत.
       सदरचा पुरस्कार कारखान्याच्या वतीने  कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे ,कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे ,संचालक कृष्णात शेडगे,टेक्नीकल डायरेक्टर नरेंद्र साळुंखे , सनी क्षीरसागर ,जीएम अशोक नलावडे ,प्लांट हेड काकासाहेब महाडीक ,जीएम प्रोसेस कदम साहेब ,चीफ इंजीनियर मोहिते साहेब , शेती अधिकारी पवार साहेब , चीफ अकौंटन मोरे साहेब प्रज्ज्वल घोरपडे व जितेंद्र घोरपडे यांनी स्वीकारला.
    कारखान्याचे को-चेअरमन मनोजदादा घोरपडे ,संचालक विक्रमनाना घोरपडे,प्रीती घार्गे ,ऍड.धनाजीराव जाधव, अण्णासाहेब निकम ,जयवंतराव जाधव, अमोल पवार, महेश घार्गे,महेश चव्हाण, युवराज साळुंखे ,जयवंत जाधव चेअरमन तोडणी वाहतूक संघटना व शेतकरी सभासद यांनी पुरस्काराबद्दल सर्वांचे अभिनंदन केले .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला