तब्बल २३ वर्षांनी भारताने घेतला श्रीलंकेचा बदला,
Satara News Team
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
- बातमी शेयर करा

कोलंबो : भारताने फक्त ५० धावांत श्रीलंकेला ऑल आऊट केले. पण ही दमदार कामगिरी करत असताना भारताने तब्बल २३ वर्षांनी हा बदला घेतल्याचे आता समोर आले आहे. कारण भारत आणि श्रीलंका यांच्यात २००० साली वनजे सामना झाला होता. या सामन्यात श्रीलंकेने भारताची अशीच अब्रु काढली होती. पण आता मात्र भारताने त्या गोष्टीचा चांगलाच बदला घेतला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तो सामना झाला होता २० ऑक्टोबर २००० या दिवशी. त्यावेळी श्रीलंकेचा कॅप्टन होताा धडकेबाज सलामीवीर सनथ जयसूर्या, तर भारताचे कर्णधार होते सलामीवीर सौरव गांगुली. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकला होता आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सनथ जयसूर्याने भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. जयसूर्याने तब्बल २१ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर १८९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. त्यावेळी जयसूर्याला गांगुलीनेच बाद केले होते. या सामन्यात रसेल अरनॉल्डनेही ५२ धावांची खेळी साकारली होती. त्यामुळे श्रीलंकेला या सामन्यात भारतापुढे ३०० धावांचे आव्हान ठेवता आले होते. त्यावेळी ३०० धावांचे आव्हान हे फारच मोठे वाटायचे. कारण त्यावेळी २०० ही धावसंख्याही जिंकण्यासाठी पुरेषी समजली जायची. पण त्यानंतर भारत या आव्हानाचा पाठलाग कसा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
भारतीय संघ श्रीलंकेच्या ३०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. पण त्यावेळी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चमिंडा वासने वादळ पाहायला मिळाले होते. आता या सामन्यात जसा मोहम्मद सिराजचा स्पेल होता तसाच त्यावेळी चमिंडा वासचा स्पेल होता. वासने त्यावेळी गांगुलीला ३, सचिन तेंडुलकरला ५, युवराज सिंगला ३ आणि विनोद कांबळीलाही तीन धावांवर बाद केले. त्यामुळे या सामन्यात भारताची अवस्था ४ बाद १९ अशी झाली होती. या सामन्यात सर्वात जास्त धावा या रॉबिन सिंगच्या नावावर होत्या, रॉबिनने त्या सामन्यात ११ धावा केल्या होत्या. या सामन्यात आत्ताचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरही होते. या सामन्यात आगरकर यांनी दोन धावा केल्य होत्या, तर गोलंदाजीत त्यांना एकही विकेट मिळाली नव्हती. पण १० षटकांत त्यांनी ६७ धावा दिल्या होत्या. या सामन्यात श्रीलंकेने भारताला ५४ धावांत ऑल आऊट केले होते आणि त्याचाच बदला आज भारताने घेतल्याचे पाहायला मिळाले.
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
संबंधित बातम्या
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
-
चॅम्पियन्स कराटे कल्ब सातारा येथील 8 खेळाडूंची शालेय विभागीय कराटे स्पर्धेकरिता निवड...
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
-
राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील आदित्य विजय खामकर याने पटकावले सुवर्ण पदक
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
-
श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्या शालेय क्रीडास्पर्धेत यशस्वी भरारी...
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
-
सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
-
राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा उत्साहात साजरा
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
-
भारताला सर्वात मोठा धक्का… पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगाट अपात्र, नेमकं कारण काय?
- Sun 17th Sep 2023 06:16 pm