तब्बल २३ वर्षांनी भारताने घेतला श्रीलंकेचा बदला,
- Satara News Team
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
- बातमी शेयर करा
कोलंबो : भारताने फक्त ५० धावांत श्रीलंकेला ऑल आऊट केले. पण ही दमदार कामगिरी करत असताना भारताने तब्बल २३ वर्षांनी हा बदला घेतल्याचे आता समोर आले आहे. कारण भारत आणि श्रीलंका यांच्यात २००० साली वनजे सामना झाला होता. या सामन्यात श्रीलंकेने भारताची अशीच अब्रु काढली होती. पण आता मात्र भारताने त्या गोष्टीचा चांगलाच बदला घेतला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तो सामना झाला होता २० ऑक्टोबर २००० या दिवशी. त्यावेळी श्रीलंकेचा कॅप्टन होताा धडकेबाज सलामीवीर सनथ जयसूर्या, तर भारताचे कर्णधार होते सलामीवीर सौरव गांगुली. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकला होता आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सनथ जयसूर्याने भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. जयसूर्याने तब्बल २१ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर १८९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. त्यावेळी जयसूर्याला गांगुलीनेच बाद केले होते. या सामन्यात रसेल अरनॉल्डनेही ५२ धावांची खेळी साकारली होती. त्यामुळे श्रीलंकेला या सामन्यात भारतापुढे ३०० धावांचे आव्हान ठेवता आले होते. त्यावेळी ३०० धावांचे आव्हान हे फारच मोठे वाटायचे. कारण त्यावेळी २०० ही धावसंख्याही जिंकण्यासाठी पुरेषी समजली जायची. पण त्यानंतर भारत या आव्हानाचा पाठलाग कसा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
भारतीय संघ श्रीलंकेच्या ३०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. पण त्यावेळी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चमिंडा वासने वादळ पाहायला मिळाले होते. आता या सामन्यात जसा मोहम्मद सिराजचा स्पेल होता तसाच त्यावेळी चमिंडा वासचा स्पेल होता. वासने त्यावेळी गांगुलीला ३, सचिन तेंडुलकरला ५, युवराज सिंगला ३ आणि विनोद कांबळीलाही तीन धावांवर बाद केले. त्यामुळे या सामन्यात भारताची अवस्था ४ बाद १९ अशी झाली होती. या सामन्यात सर्वात जास्त धावा या रॉबिन सिंगच्या नावावर होत्या, रॉबिनने त्या सामन्यात ११ धावा केल्या होत्या. या सामन्यात आत्ताचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरही होते. या सामन्यात आगरकर यांनी दोन धावा केल्य होत्या, तर गोलंदाजीत त्यांना एकही विकेट मिळाली नव्हती. पण १० षटकांत त्यांनी ६७ धावा दिल्या होत्या. या सामन्यात श्रीलंकेने भारताला ५४ धावांत ऑल आऊट केले होते आणि त्याचाच बदला आज भारताने घेतल्याचे पाहायला मिळाले.
स्थानिक बातम्या
दिवाळी दहा दिवसांवर तरीही फटाके विक्रीची परवानगी नाही.
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
शिवथर मध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे आगमन
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
मुंबईत टोलमाफी; साता-याला का नाही?
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्या शालेय क्रीडास्पर्धेत यशस्वी भरारी...
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
कारखानदारांविरोधात कराड-उत्तर मधून लढवणार निवडणूक: वसिम इनामदार.
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
संबंधित बातम्या
-
श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्या शालेय क्रीडास्पर्धेत यशस्वी भरारी...
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
-
सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
-
राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा उत्साहात साजरा
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
-
भारताला सर्वात मोठा धक्का… पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगाट अपात्र, नेमकं कारण काय?
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
-
24 जुलै पासून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या तालुका निहाय स्पर्धा आयोजन बैठका
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
-
साताऱ्याच्या प्रसाद ने साता समुद्रापार रोवला विजयाचा झेंडा
- Sun 17th Sep 2023 06:16 pm
-
श्रीपतराव पाटील स्कूल करंजेपेठच्या खेळाडूंची आर्चरी स्पर्धेत भरारी...
- Sun 17th Sep 2023 06:16 pm