सातारा जिल्ह्याच्या 6 तालुक्यात भीषण पाणी टंचाई, हजारो नागरिकांना ऐन पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा
Satara News Team
- Sun 10th Jul 2022 06:21 am
- बातमी शेयर करा

माण तालुक्यातील पाचवड, पांगरी, बिजवडी, वडगाव, वारुगड या 5 गावांसह 28 वाड्या वस्त्यांमधील 7 हजार 308 नागरिकांना 4 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव, गडगेवाडी, बालेघर अंतर्गत अनपटवाडी, कासुर्डेवाडी, गुंजेवाडी, ओहळी या गावांसह 2 वाड्यामधील 5 हजार 381 नागरिकांना व 3 हजार 262 जनावरांना 2 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
सातारा : राज्यात मागच्या काही दिवसांपासून जवळजवळ सर्वच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. याचबरोबर सातारा जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर, पुर्वेकडे पावसाने पाठ फिरवली आहे. असे असतानाही ऐन पावसाळ्यात माण, वाई, पाटण, जावली, सातारा व कराड तालुक्यातील 16 गावे व 39 वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे.
सुमारे 20 हजार 845 नागरिक व 7 हजार 63 जनावरांची तहान 12 टँकरवर अवलंबून आहे. सातारा जिल्ह्यात मे महिन्यापासून काही गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ऐन पावसाळ्यातही टँकर सुरू आहेत. सध्या पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पूर्वेकडे मात्र पावसाने ओढ दिली आहे. ऐन पावसाळ्यात तरी टँकर बंद होतील अशी आशा प्रशासनाला होती. मात्र, पावसाळा सुरू झाला असला तरी बहुतांश ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत.
माण तालुक्यातील पाचवड, पांगरी, बिजवडी, वडगाव, वारुगड या 5 गावांसह 28 वाड्या वस्त्यांमधील 7 हजार 308 नागरिकांना 4 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव, गडगेवाडी, बालेघर अंतर्गत अनपटवाडी, कासुर्डेवाडी, गुंजेवाडी, ओहळी या गावांसह 2 वाड्यामधील 5 हजार 381 नागरिकांना व 3 हजार 262 जनावरांना 2 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
पाटण तालुक्यातील जंगलवाडी, जाधववाडी, चव्हाणवाडी, फडतरवाडी, घोट, आंब्रुळकरवाडी, भोसगाव या वाड्या मधील 1 हजार 759 नागरिकांना व 843 जनावरांना एका टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
जावली तालुक्यातील गवडीमधील 2 हजार 532 नागरिकांना व 1 हजार 102 जनावरांना 2 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सातारा तालुक्यातील जांभगाव व आवाडवाडी येथील 1 हजार 490 नागरिकांना व 340 जनावरांना 2 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
कराड तालुक्यातील वानरवाडी, बामनवाडी, जंगलवाडी येथील 2 हजार 375 नागरिक व 1 हजार 516 जनावरांना 2 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणी भरण्यासाठी सुमारे 20 विहिरी व 16 विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली.
#satara
#satarazilhaparishad
#SATARANEWS
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Sun 10th Jul 2022 06:21 am
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Sun 10th Jul 2022 06:21 am
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Sun 10th Jul 2022 06:21 am
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Sun 10th Jul 2022 06:21 am
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Sun 10th Jul 2022 06:21 am
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Sun 10th Jul 2022 06:21 am
संबंधित बातम्या
-
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Sun 10th Jul 2022 06:21 am
-
शिवडे फाटा अंधारातच! यात्रेपूर्वी लाईट सुरू न झाल्यास शिवसेनेचा इशारा — आंदोलन अटळ!
- Sun 10th Jul 2022 06:21 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्राच्या खाकीची चर्चा अन् कौतुकही.
- Sun 10th Jul 2022 06:21 am
-
गोविंद मिल्कच्या आयकर तपासणीबाबत महत्वाची माहिती समोर
- Sun 10th Jul 2022 06:21 am
-
वडोली निळेश्वर येथील महिला मेळाव्यातून महिला सशक्तिकरण व सबळीकरणाचा नारा
- Sun 10th Jul 2022 06:21 am
-
सुरूचि महिला ग्रंथालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा आनंदात संपन्न
- Sun 10th Jul 2022 06:21 am
-
राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक
- Sun 10th Jul 2022 06:21 am
-
खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
- Sun 10th Jul 2022 06:21 am